सावधान ! ‘कोरोना’ विरूद्धच्या लढाईत अनेक देश ‘या’ गंभीर आजाराकडे करतायेत ‘दुर्लक्ष’, सर्वेक्षणात ‘भयंकर’ परिणाम

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : देशात वेगाने वाढत असलेला कोरोना विषाणू आगामी काळात टीबी संबंधित मृत्यूस कारणीभूत ठरू शकतो. एका अभ्यासात असा दावा केला गेला आहे की येत्या पाच वर्षांत भारतात टीबीचे रुग्ण वाढू शकतात. आरोग्य सेवांमध्ये व्यत्यय, निदान आणि उपचारांना उशीर झाल्यामुळे भारतात 95,000 टीबी संबंधित रुग्णांच्या मृत्यूला कारणीभूत कोरोना विषाणू ठरू शकतो. कोविड -19 पूर्वी दररोज जगातील 4,000 हून अधिक लोक टीबी ने मरत होते. ज्या देशांमध्ये आरोग्य सेवा ठप्प आहेत तिथे टीबीची प्रकरणे आणि मृत्यूंमध्ये लक्षणीय वाढ होण्याची भीती आहे.

लंडनच्या संशोधकांनी धक्कादायक खुलासे केले

लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिन (एलएसएचटीएम) आणि लँकेस्टर युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी पुढील पाच वर्षांत चीन, भारत आणि दक्षिण आफ्रिका येथे अतिरिक्त टीबीने होणारे मृत्यू आणि प्रकरणांचा अंदाज लावला आहे.

कोरोना विषाणूच्या काळात साथीच्या सामाजिक संपर्कातून प्रसाराचा आणि त्यामुळे आरोग्य सेवेवर होणार्‍या परिणामांचा त्यांनी शोध घेतला आहे. लोकांमध्ये सोशल डिस्टेंसिंगने टीबी रोग कमी होऊ शकेल असा संशोधकांनी अनुमान लावला.

सोशल डिस्टेंसिंग टीबीवर मात करण्यास मदत करेल

असे यामुळे कारण कोरोना विषाणूप्रमाणेच टीबीच्या आजाराचे कारण मायकोबॅक्टीरियम ट्यूबरकुलोसिस (एक जिवाणू) हे असून ते हवेत थेंबांच्या माध्यमातून एकमेकांना संक्रमित करतात. तथापि, या अहवालात सोशल डिस्टेंसिंगने टीबीच्या प्रसारास कमी केल्याने देखील भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेत 110,000 हून अधिक टीबीच्या रुग्णांच्या मृत्यूचा अंदाज आहे. ज्या देशांमध्ये कोरोना विषाणूचा आरोग्य सेवेवर गंभीर परिणाम झाला आहे अशा देशांमध्ये टीबी पासून मृत्यूची संख्या 200,000 पर्यंत वाढू शकते.

पुढील पाच वर्षांत टीबीची समस्या वाढू शकते

या टीमने चीन, भारत आणि दक्षिण आफ्रिका या तीन देशांमधील टीबीच्या घटनांमध्ये आणि मृत्यूवर या घटकांचा होणारा परिणाम मोजला, जो जागतिक टीबीच्या घटनांमध्ये सुमारे 40% आहे. त्यांनी जागतिक टीबीच्या घटनांवर कोरोना विषाणूच्या परिणामाचा अंदाज लावण्यासाठी सहा महिन्यांपर्यंत चालणाऱ्या सोशल डिस्टेंसिंगच्या उपाययोजनांच्या आणि विविध अंमलबजावणी व विविध प्रकारच्या आरोग्यविषयक परिस्थितींचे मॉडेल तयार केले. आरोग्यसेवा कमी झाल्यास पुढील पाच वर्षांमध्ये टीबीचे रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण वाढू शकेल असे संशोधकांना आढळले. संशोधकांच्या मते चीनमध्ये 6,000, भारतात 95,000 आणि दक्षिण आफ्रिकेत 13,000 अतिरिक्त मृत्यू होऊ शकतात.

टीबीच्या रुग्णांची काळजी घ्यावी लागेल

एलएसएचटीएम येथील संसर्गजन्य रोग महामारी विज्ञानातील सहाय्यक प्राध्यापक फिन मॅकक्यूइड म्हणाले, ‘चिंता अशी आहे की बर्‍याच देशांमध्ये कोरोना विषाणूमुळे टीबीच्या उपचारांमध्ये कमतरता आली आहे, रूग्णांना उपचार घेण्यास उशीर झाल्याने त्यांची अवस्था गंभीर अवस्थेत पोहोचली आहे.’ ते पुढे म्हणाले की टीबीच्या रूग्णांची काळजी व उपचारात कोणतीही कमी होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी आता काम करण्याची गरज आहे. अन्यथा, कोरोना विषाणूच्या साथीला संपुष्टात आणण्याच्या लढाईत टीबी आपल्यासाठी नवीन समस्या ठरेल.