मराठा आरक्षणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर, तोपर्यंत मेगाभरती नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणावर अंतिम सुनावणीला नवीन वळण मिळाले आहे. मराठा आरक्षणावर आजपासून नियमित सुनावणी सुरु झाली आहे. सुप्रिम कोर्टाने 1 सप्टेंबर रोजी यावर निकाल देणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. यामुळे राज्य सरकारला आणखी दीड महिन्याचा वेळ मिळाला आहे.

न्ययमूर्ती एल. नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखाली न्या. हेमंत गुप्ता. आणि न्या. रवींद्र भट यांच्या त्रिसदस्यीय न्यापीठासमोर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून तीन दिवसीय सुनावणीला सुरुवात झाली आहे. 25 ऑगस्ट रोजी तीनपेक्षा जास्त न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर मुख्य सुनावणी करायची की नाही याबाबत सुनावणी होणार आहे. सर्व पक्षकारांनी आपआपले म्हणणे द्यायचे आहे. जर घटनापीठाकडे प्रकरण गेले नाही तर 1 सप्टेंबरपासून सुनावणी होईल. तर कोर्टात राज्य सरकार म्हणाले, 15 सप्टेंबर पर्यंत कोणतीही भरती करणार नाही, असं स्पष्ट करण्यात आले.

आज व्हिडीओ कॉन्फरन्सिमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सुनावणी सुरु होण्यास उशीर झाला. राज्य सरकारकडून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी करणे कठीण असल्याचा युक्तीवाद करण्यात आला. त्यामुळे मराठा आरक्षणावरील पुढील सुनावणी 1 सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आली. न्यायमुर्ती एल. नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील न्या. हेमंत गुप्ता आणि न्या. रवींद्र भट यांच्या त्रिसदस्यीय न्यायपीठाने हे आदेश दिले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी घेताना या अडचणी येत असल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली.