‘ते’ करण्यासाठी अभिनेत्री स्पृहा जोशी खूपच आतुर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशी शुटींगसाठी मुंबईच्या बाहेर आहे. ती मुंबईत आल्यांतर सर्वात आधी पाणी फाऊंडेशनसाठीच्या श्रमदानात सहभागी होणार आहे. सिनेसृष्टीतील इतरही कलाकार यात सहभागी होणार असल्याचंही समजत आहे.

पाणी फाऊंडेशनसाठीच्या श्रमदानाची सुरुवात 1 मे रोजी होणार आहे. या श्रमदानासाठी स्पृहा जोशी जाणार असल्याचं समजत आहे. दरम्यान याबाबत सांगताना स्पृहाने आपला मागील वर्षातील श्रमदानाचा अनुभवदेखील सांगितला आहे. स्पृहा म्हणते की, “मुंबई-पुण्यातल्या सुखावह ठिकाणी आयुष्य जगत असताना या शहरांबाहेरील ठिकाणी राहणाऱ्या गाव-पाड्यांमध्ये पाण्यासाठी तेथील महिलांना वणवण फिरावं लागतं. पाण्यासाठी तेथील नागरिकांची काय अवस्था आहे हे पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून मला समजलं.” असं सपृहा म्हणाली.

पुढे बोलताना स्पृहा म्हणते की, “पाणी फाऊंडेशनसोबत, दुष्काळाशी दोन हात करताना, पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन संघटित होणारे, जातिव्यवस्था निर्मुलन होऊन एकमेकांमधले पिढ्यांपिढ्यांचे मतभेत विसरून, एकत्र पगतीला बसणारे गावकरी मी पाहिले आहेत. मोठ्या शहरात राहणारी सुखवस्तू कुटुंबातील उच्चशिक्षित मुलं, गावात येऊन कुदळ-फावडे हातात घेत उन्हात घाम गाळताना पाहताना, इंडिया भारतात परतल्याचा सुखद अनुभव मिळतो. पाणी फाऊंडेशनची मोहिम ही आता चळवळ झाली आहे. पाणी फाऊंडेशनसाठी काम करताना नैसर्गिक आपत्तीवर आपण मात करण्याचा आनंद गावकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मला दिसून आला आहे. या आनंदात मीही सहभागी असल्याचे समाधान काही औरच असते. गेल्यावर्षी मी एकटीच श्रमदानासाठी गेले होते. पण यावेळी मात्र आई आणि काकूसोबत श्रमदानात सहभागी होणार आहे.” असे सपृहाने सांगितले.

स्पृहा जोशीने गेल्यावर्षी श्रमदान केले होते. पुरंदर तालुक्यातील पोखर या गावात तिने श्रमदान केले आहे. या श्रमदानाशिवाय पाणी फाऊंडेशनने जे काही अन्य उपक्रम राबविले होते त्यातही स्पृहाने सक्रिय सहभाग घेतला होता.

स्पृहाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सध्या ती झांसीमध्ये तिच्या आगामी सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. हे शुटींग पूर्ण झाल्यानंतर ती लगेचच मुंबईत परत येणार आहे. मुंबईत आल्यानंतर सर्वात आधी ती पाणी फाऊंडेशनच्या श्रमदानात सहभागी होणार आहे.