मराठी माणूस मागे आहे हा भ्रम काढून टाका : राज ठाकरे

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन – ‘मी उद्योजक होणार’ या मुंबईतील कार्यक्रमाकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तसेच शिवसेनेचे जेष्ठ नेते मनोहर जोशी यांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे हे दोघे एकाच मंचावर उपस्थित होते.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’febcd9c0-d05f-11e8-8f75-79aaf68f7904′]

यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी “आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर”, असं अनेक वर्षांपूर्वी ज्येष्ठ कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी सांगून ठेवलंय. चटके-फटके खाल्ल्याशिवाय यश मिळत नाही. स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द आणि हिंमत असेल तर तुम्ही यशस्वी उद्योजक होऊ शकता, असा मंत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज तरुणांना दिला.

[amazon_link asins=’B073JW8LNK,B077S3Y5MQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1caf52ef-d060-11e8-86ff-1912cad5ae4c’]

गुजराती माणूस हुशार असतो हे आता कळून चुकलंय, असा टोला लगावतानाच, मराठी माणूस मागे आहे हा भ्रम काढून टाका, असा सल्लाही त्यांनी दिला. मी उद्योजक होणारच, या कार्यक्रमात राज यांचं भाषण झालं.

देशातील श्रीमंत वस्तीत ‘पाणीबाणी’

उद्योगपती टाटांसह अनिल अंबानी, सायरस मिस्त्री, बजाज यांना पाणी टंचाईचा त्रास
मुंबई : राज्यात पाणी टंचाईचे संकट हे केवळ सामान्य जनतेवर आहे ,  असे नाहीये तर आज चक्क देशातील श्रीमंत वस्तीत पाणीटंचाईची स्थिती निर्माण  झाली आहे. देशातील सर्वाधिक श्रीमंत लोक राहत असलेल्या कफ परेड भागात टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.उद्योगपती रतन टाटा यांच्यासह अनिल अंबानी, सायरस मिस्त्री, बजाज यांच्यासह अनेक उद्योगपतींच्या घरात गेल्या तीन दिवसांपासून महापालिकेचे पाणी आलेच नाही. त्यामुळे त्यांना पाण्याशिवाय दिवस काढावे लागलेत.

मुंबईतल्या सर्वात उच्चभ्रु ,श्रीमंत वस्तीत कफ परेड, कुलाबा, फोर्ट या ठिकाणी गेले तीन दिवस पाणी नाही. या भागात मोठ्या उद्योगपतींसह मोठे प्रशासकिय अधिकारी, बँकांचे अधिकारी यांच्याही रहिवासी इमारती इथेच आहेत. कफ परेडमध्ये राहणारे भाजप नगरसेवक मिलिंद नार्वेकर यांच्याच घरी पाणी नसल्याने त्यांनाही तोंड द्यावे लागले आहे.या ठिकाणीही महापालिकेच्या पाईपलाईननं पाणीपुरवठा होतो. मात्र, पाणीपुरवठा होत नसल्याने पाण्यासाठी त्यांचे हाल होत आहेत.या ठिकाणी मेट्रोच्या तीन स्टेशन्सचं काम सुरु आहे. मेट्रोला पाणी वळवण्यात येते आहे, असाही इथल्या स्थानिकांचा आरोप आहे. गेले दोन महिने ३०-४० टक्केच पाणीपुरवठा होत आहे. कुलाबा, कफ परेडमध्ये टँकरनं पाणी भरण्याची वेळ आली आहे. दरम्यान, टँकरमाफिया आणि प्रशासनातील अधिकारी यांच्या संगनमतानं कृत्रीम पाणीटंचाई निर्माण केली जातेय, असा आरोप एका नगरसेवकाने केलाय.