पोलीसनामा ऑनलाइन – ज्येष्ठ रंगकर्मी अनंत मिराशी यांचं वयाच्या 83 व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झालं आहे. आज पहाटे 4 वाजताच्या दरम्यान त्यांनी जगाचा निरोप घेतला. मिराशी यांच्यानंतर त्यांची पत्नी, मुलगा, नात असं कुटुंब आहे. त्यांच्या जाण्यानं नाटक, मालिका आणि सिनेमा जगात शोक व्यक्त केला जाताना दिसत आहे.
अनंत मिराशी हे मूळचे कोल्हापूरचे होते. त्यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी अनेक प्रसिद्ध कंपन्यांच्या नाटक, मालिका आणि सिनेमात काम केलं आहे. त्यांनी खास त्यांच्या नाटकातून विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. आय एन टी, दुर्वांची जुडी, रंगमंच, मुंबई, नाट्यंपदा, रंजन काल मंदिर अशी काही त्यांनी काम केलेल्या मोठ्या कंपन्यांची नावं सांगता येतील.
यापैकी दुर्वांची जुडीमधील बाळू आपटे या त्यांच्या नाटकाला खूप प्रसिद्धी मिळाली आहे. त्यांच्या नाटकाबद्दल सांगायचं झालं तर रंगमंच आणि मुंबई या संस्थांच्या नटसम्राट, रायगडाला जेव्हा जाग येते, असं झालंच कसं?, मी तर बुवा अर्धाच शहाणा अशी त्यांनीच काही नाटकं सांगता येतील.