…तर राष्ट्रवादीवर कदाचित ही वेळ आली नसती : डॉ. पद्मसिंह पाटील

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे व माजी मंत्री आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय राहिलेले डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. सुप्रियांनी माझ्यापेक्षा पक्षातील नेत्यांची काळजी घेतली असती, पक्षांतर्गत कुरघोड्यांना वेळीच पायबंद घातला असता तर पक्षावर कदाचित आज ही वेळ आली नसती, असे अशा शब्दांत डॉ. पद्मसिंह पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना सुनावले आहे.

वडिलांना अर्ध्या रस्त्यावर सोडून राणा पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. तर डॉ. पाटील यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल असल्याने त्यांना भाजपने प्रवेश नाकारला आणि ते त्यांच्या मुलाने सहन केले असे विधान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले होते. त्यांनी केली ही टीका माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांना चांगलीच जिव्हारी लागली आहे.

… त्यामुळे माझ्या पक्षप्रवेशाचा प्रश्नच येत नव्हता –

सुप्रिया सुळेंवर पलटवार करताना पद्मसिंह पाटील म्हणाले की , ‘सुप्रिया मला मुलीसारख्या आहेत. त्यांनी माझी काळजी व्यक्त करताना वस्तुस्थितीला धरून मत व्यक्त केले असते तर आनंद वाटला असता. राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्त्यांनी मिळून जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने पक्षबदलाचा आग्रह धरला होता. त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून राणांच्या पक्षांतराचा निर्णय घेतला. या निर्णयासाठी मी स्वत: तुळजापूरपर्यंत त्यांच्यासोबत जाऊन त्यांना आशिर्वाद दिले होते. तत्पूर्वी 31 ऑगस्टला झालेल्या मेळाव्यात मी स्वत: राणांना राजकीय वाटचालीस आशीर्वाद दिले होते व ‘राणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा’ असे आवाहन समर्थकांना केले होते.

2014 पासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी सक्रिय राजकारणात नाही, हे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासह सर्वाना माहीत आहे. त्यामुळे माझ्या पक्षप्रवेशाचा प्रश्नच येत नव्हता. त्यामुळे मी सोलापूरला जाण्याचा विषयच उद्भवत नव्हता.

मग राणाजगजितसिंह यांना पक्षप्रवेश कसा दिला ?

हे खासदार सुप्रिया सुळे यांना माहीत असतानाही त्यांनी माझा पक्षप्रवेश रोखला, असे केलेले विधान खेदजनक असल्याचे डॉ. पद्मसिंह पाटील यांनी म्हटले आहे. त्यांनी केलेले विधान जर सत्य असते, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यामुळे माझ्या पक्षप्रवेशाचा प्रश्नच येत नव्हता दिला असता, असा सवालही डॉ. पाटील यांनी उपस्थित केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –