तिहेरी हत्याकांडानं बीड हादरलं ! शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांचा खून

पोलिसनामा ऑनलाईन – राज्यभरात कोरोनाने धुमाकूळ घातला असताना अनेकांकडून एकमेकांना मदतीचा हात दिला जात आहे. दुसरीकडे बीडमध्ये मात्र शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड झाल्याने खळबळ उडाली आहे. शेतीच्या वादातून टोळक्याने एका कुटुंबावर हल्ला करुन तिघांचा खून केला. हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मांग वडगाव इथे घडली आहे.

मांगवडगाव इथे शेतजमिनीचा वाद दोन गटांमध्ये टोकाला गेला होता. या वादातून एकाच कुटुंबातील तीन जणांसह एका व्यक्तीवर गावातील काही अज्ञातांनी हल्ला केला. पूर्ववैमन्यशातून टोळक्याने एकाच कुटुंबातील तिघांना संपवले आहे. हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून जखमींला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. तर 3 जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. बीडमध्ये रात्री उशिरा घडलेल्या या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे.