कौतुकास्पद ! मुलाच्या मृत्यूनंतर 2 वर्षांनी केलं सूनेचं ‘लग्न’, मुलीसारखी केली ‘पाठवणी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – छत्तीसगडमधील बेमेतारा येथील एका कुटुंबाने मुलाच्या मृत्यूच्या दोन वर्षानंतर सुनेचे पुन्हा लग्न लावून दिले. कुटुंबीयांनी त्यांच्या सुनेची मुलीप्रमाणे पाठवणी केली. बेमेतरा येथील बाजार पारा येथील रहिवासी कृष्णासिंह राजपूत यांचा मुलगा दोन वर्षांपूर्वी मरण पावला. कृष्णा सिंहने दोन वर्षांपर्यंत आपल्या सुनेला मुलीसारखं ठेवलं. यानंतर, योग्य वर पाहून पूर्ण विधी- परंपरेने तिचे पुन्हा लग्न लावून दिले. लोक राजपूत समाजाच्या या कार्यक्रमाचे कौतुक करीत आहेत.

बिलासपुरमध्ये राहणारे राजकुमार सिंह् यांची मुलगी आरती सिंहचे लग्न 2016 मध्ये बेमेतरा येथील रहिवासी कृष्णा सिंह यांचा मुलगा गौतम सिंह याच्याशी झाला होता. विवाहानंतर अवघ्या दोन वर्षानंतर गौतम सिंहचे निधन झाले. राजपूत क्षत्रिय महासभा छत्तीसगडने गेल्या वर्षी अशा भागासाठी विधवा विवाहाचा मार्ग खुला केला आणि ठा. होरी सिंह डौड़ अध्यक्ष महासभेच्या नेतृत्वात गतवर्षी महासभेत विधवा विवाहाच्या संदर्भात एक ठराव मंजूर करून त्यास मान्यता देण्यात आली.

विधवा विवाह स्वीकारल्यानंतर कृष्णासिंह राजपूत यांनी आपल्या सुनेसाठी योग्य वर शोधण्यास सुरुवात केली. आरती सिंगचे सासरे ठा. कृष्णासिंह राजपूत यांनी वडिलांचा धर्म पाळत आपली सून आरतीचे पूर्ण परंपरेनुसार आपल्या कुटुंबातील व समाजातील प्रमुखांच्या उपस्थितीत ठा. गिरधारी सिंह यांचा मुलगा ऐमिल सिंह यांच्यासह 30 जून रोजी बेमेतारा लग्न लावून दिले. हा प्रस्ताव लागू झाल्यानंतर राजपूत समाजात प्रथमच विधवा विवाह पूर्ण झाल्याचे बोलले जात आहे. विवाह सोहळ्यादरम्यान ठा. होरी सिंह डौड, केंद्रीय अध्यक्ष, ठा.अजय सिंह, वरिष्ठ उपाध्यक्ष यांच्यासह बरेच लोक उपस्थित होते. सर्वांनी वर- वधूला नवीन आशीर्वाद दिले.