सागर, मुकुंद माने, जावेदखान, विनोद आणि अनोळखी चौघे (पूर्ण नावे, पत्ता नाहीत) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.
[amazon_link asins=’B01BY8XHX8′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’30e7b766-95a3-11e8-b5e7-571737d77883′]
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही माण तालुक्यातील आहे. ती पतीसह हॉटेल व्यवसाय करते. त्यांच्या हॉटेलमध्ये कामासाठी एक विवाहित जोडपे हवे होते. यासाठी ते शोध घेत होते. दरम्यान मुकुंद माने याने महिलेच्या पतीला फोन करुन ‘तुरची फाटा येथे एक जोडपे आहे. वीस हजार रुपये अॅडव्हान्स देण्यासाठी घेऊन या’, असे सांगून बोलावून घेतले.
मंगळवारी सायंकाळी पाच ते सहाच्या सुमारास पती- पत्नी तुरची फाटा येथील एका चाळीजवळ पैसे घेऊन पोहोचले. त्यावेळी मुकुंद माने याने त्याच्यासोबत असलेल्या सागरला ‘यांना मारा’ असे सांगितले. सागरने दोघांनाही प्लॅस्टिकच्या पाईपने मारहाण करण्यास सुरूवात केली. यानंतर महिलेच्या गळ्याती तीन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, दीड तोळ्यांची सोनसाखळी आणि रोख 20 हजार काढून घेतले.
यानंतर दुचाकीवरुन आणखी चौघेजण त्याठिकाणी आले. महिलेच्या पतीला तिथे उभ्या असलेल्या कारमध्ये डांबून ठेवले. महिलेला जबरदस्तीने ओढून तेथीलच एका खोलीमध्ये नेले. तिथे सर्वांनी तिच्यावर बलात्कार केला अशी तक्रार आहे. यानंतर पतीला त्याठिकाणी आणण्यात आले. ‘इथून गप निघून जायचे. पोलिसांत जाऊ नका. तुमचे कोणी ऐकणार नाही. मी इथलाच आहे.’, असे सांगून दम दिला. सहायक पोलिस निरीक्षक उमेश दंडिले अधिक तपास करीत आहेत.