मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चाचे नेतृत्व कॉ.बब्रुवाहन पोटभरे यांनी केले.यावेळी उपजिल्हाधिकारी यांना तहसीलदार अंबाजोगाई यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘अन्न सुरक्षा, केरोसीन व सणावाराचे सामान गोर-गरीबांना वेळेवर मिळत नाही. शहरी भागातील झोपडपट्टया व गरीबांच्या वस्त्या यांना सरसकट अन्न सुरक्षेत घेण्याची आमची जुनी मागणी आहे. परंतु, महसूल प्रशासन गरीबांच्या जीवनाकडे गंभीरपणे पाहत नाही. उलट त्यांचे वैयक्तिक हितसंबंध, सरकारी जमीनीचे खाजगी व्यवहार रेती व धान्याचा काळा बाजार यात गुंतलेले आहेत. त्यामुळे ते लोकहिताची कामे करू शकत नाहीत. त्यामुळे उपजिल्हाधिकारी यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या निवेदनातील पुढील मागण्या मान्य कराव्यात.’
जाहिरात
विशेष म्हणजे वरील सर्व मागण्या बाबत आठ दिवसात कार्यवाही झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर कॉ.बब्रुवाहन पोटभरे, कॉ.बाबासाहेब सरवदे, आशाबाई जोगदंड, मिरा पाचपिंडे,सविता गायसमुद्रे,दिपमाला सरवदे,छाया तरकसे, जयश्री जोगदंड,मिरा जोगदंड,रंजना जोगदंड, विजयादशमी पाचपिंडे, छाया गायकवाड, पंचशिला कांबळे, वैशाली मस्के, अजिजा शेख, कविता कांबळे, अलका जोगदंड आदींसहीत महिला कार्यकर्त्यांच्या स्वाक्षर्या आहेत.
जाहिरात