अहमदनगर : ‘त्या’ निधीसाठी महापौरांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शहर विकासासाठी नगरोत्थान योजनेअंतर्गत सरकारने मंजूर केलेल्या १०० कोटी निधीतील महापालिकेच्या वाट्याची ३० कोटींची अट रद्द करावी. ही रक्कम राज्य सरकारने भरावी अशी मागणी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यावेळी पालकमंत्री प्रा. राम शिंदे हे उपस्थित होते.

महापालिकेला पूर्णवेळ शहर अभियंता दिला जावा. विद्युत अभियंत्यांसह इतर अभियंत्यांच्या रिक्तपदांची भरती करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी महापौर बाबासाहेब वाकळे व भाजपच्या सर्व नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत मंत्रालयात काल या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेवून निवेदन दिले. यावेळी नगरसेवक रवींद्र बारस्कर, मनोज कोतकर, महेंद्र गंधे, राहुल कांबळे, संजय ढोणे, उदय कराळे, सतीश शिंदे, विलास ताठे आदी उपस्थित होते.

निवेदनात त्यांनी म्हंटले आहे की, शहर विकासासाठी सरकारने सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत १०० कोटीचा निधी मंजूर केला आहे. परंतु कामे प्रस्तावित करताना ७० टक्के निधी शासनाचा व ३० टक्के हिस्सा महापालिकेला टाकावा, अशी अट आहे. प्रत्यक्षात 30 टक्के वाटा भरण्याची महापालिकेची परिस्थिती नाही. त्यामुळे हा वाटा राज्य शासनाने भरावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

७ दिवसात आत जाऊ शकते पोट, ‘हे’ ११ उपाय आहेत ‘रामबाण’
आरोग्य समस्यांवर ‘हे’ १० छोटे-छोटे घरगुती उपाय, जाणून घ्या
भारतात HIV पेक्षाही ‘हिपॅटायटीस’ अधिक घातक, पावसाळ्यात विशेष काळजी घ्या
‘सेक्स पॉवर’ कमी झाल्यास बिघडू शकते वैवाहिक जीवन, करा ‘हे’ खास उपाय
अशाप्रकारे परत मिळू शकते त्वचेची चमक, ‘हे’ ४ उपाय आवश्य करा
औषधी न घेता आहाराने लिव्हर ठेवा ठणठणीत, जाणून घ्या ११ उपाय