श्रीनगर : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राजस्थानच्या बाडमेरमधील सभेमध्ये पाकिस्तान वारंवार भारताला त्यांच्याकडे असलेल्या अण्वस्त्रांची धमकी देत आहे. मात्र, भारत त्यांच्या धमक्यांना घाबरत नाही. आमच्याकडेही अण्वस्त्रं आहेत ते आम्ही दिवाळीसाठी राखून ठेवलेले नाहीत, असे वक्तव्य केले होते.
मोदींच्या या वक्तव्यावर पलटवार करताना मेहबूबा मुफ्ती यांचे पाकिस्तान प्रेम उफाळून आले आहे. भारताने दिवाळीसाठी अणवस्त्र राखून ठेवली नाहीत तर पाकिस्तानेही ईदसाठी ठेवलेली नाहीत. अशा शब्दात त्यांनी मोदींना प्रत्युत्तर दिले आहे.
भारताने पाकिस्तानच्या धमक्यांना घाबरण्याचे धोरण आता सोडून दिले आहे. याआधी पाकिस्तान नेहमी भारताला अण्वस्त्रांची धमकी देत होता. पाकिस्तान म्हणायचा की आमच्याकडे न्युक्लिअर बॉम्ब आहे. मग भारताकडे काय आहे ? आमच्याकडील अण्वस्त्र आम्ही दिवाळीसाठी ठेवलेली नाहीत. भारत आज युद्ध न करता पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांना ठार करीत आहे. आम्ही दहशतवाद्यांच्या मनात दहशत निर्माण केली आहे.
पाकिस्तानला मिळालेल्या खुल्या सूटमुळे देशात दहशतवादी हल्ले सामान्य गोष्ट बनली होती. आम्ही दहशतवाद्यांची सगळी मस्ती जिरवली आहे, अशा शब्दात त्यांनी जनतेला संबोधित केले होते.
If India hasn’t kept nuclear bomb for Diwali, it’s obvious Pakistan’s not kept theirs for Eid either. Don’t know why PM Modi must stoop so low & reduce political discourse to this.
— Mehbooba Mufti (@MehboobaMufti) April 22, 2019