मोदी सरकारचा महत्वाचा निर्णय ! आंतरराष्ट्रीय प्रवाशांना भारतात येण्याचा मार्ग मोकळा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   करोना व्हायरसचा (Coronavirus) फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून व्हिसावर सुद्धा निर्बंध घातले होते. मात्र आता अनलॉक 5.0 अंतर्गत बऱ्याच गोष्टी सुरु झालेल्या असताना केंद्र सरकारने आता व्हिसा (visa) वरील निर्बंध सुद्धा शिथील केले आहेत. ओसीआय आणि पीआयओ कार्डधारकांना तसेच परदेशी नागरिकांना (permits-entry-of-all-international-travellers) भारतात यायचे असेल, तर त्यांना हवाई आणि समुद्री मार्गाने (enter-by-air-or-water-routes) प्रवेश करण्यास परवानगी दिली आहे. फक्त पर्यटन व्हिसाला अजून परवानगी दिली गेली नाही.

इलेक्ट्रॉनिक व्हिसा आणि पर्यटक व्हिसा वगळता सर्व व्हिसा तात्काळ प्रभावाने पूर्ववत करण्यात येत असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. परदेशी नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी भारतात यायचे असेल, तर ते त्यांच्यासह देखभाल करणाऱ्या व्यक्तींच्या वैद्यकीय व्हिसासाठी अर्ज करु शकतात. व्हिसाची मुदत संपली असेल तर, ते नव्याने व्हिसासाठी अर्ज करु शकतात. या निर्णयामुळे व्यवसाय, कॉन्फरन्स, नोकरी, अभ्यास, संशोधन आणि वैद्यकीय उपचारांसाठी परदेशी नागरिक भारतात येऊ शकतात.