ठाकरे सरकारचा फडणवीसांना इशारा ! ‘तुमच्या धमक्यांच्या व्हिडीओ क्लिप बाहेर काढायला लावू नका’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील महाविकासआघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर आज भाजपाकडून सरकारच्या कामाची पोल-खोल करण्यात आली. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. हात धुऊन मागे लावू म्हणणारे उद्धव ठाकरेंसारखे धमकावणारे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहास पाहिले नसतील. उद्धव ठाकरे यांनी केलेले वक्तव्य मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला शोभणार नाही. अशी टीका देवेंद्र फडणीस यांनी केली. देवेंद्र फडवणीस यांच्या टीकेनंतर आता सरकारकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे म्हणाले, की देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री असताना त्यांनी कशा धमक्या दिल्या त्याच्या व्हिडीओ क्लिप आहेत त्या बाहेर काढायला लावू नका. उद्धव ठाकरे हे ज्या संस्कारात लहानाचे मोठे झाले. त्यात धमकावण त्यांना कधीच जमलं नाही. एखादी व्यक्ती बदनाम होत नसेल तर त्या व्यक्तीला विविध पद्धतीने बदनाम करण्याची भाजपची जुनी पद्धत आहे.

ठाकरे सरकारच्या वर्षभराच्या कामगिरीवर भाजपने आज “ठाकरे सरकारची काळी पत्रिका” नावाच्या पुस्तिकेचे प्रकाशन केले. फडणवीस यांनी यावेळी ठाकरे सरकार सर्वच बाबतीत सपशेल अपयशी असल्याचा सांगत सरकार मधील तीन पक्षांमध्ये समन्वय नसल्याचे सांगितलं. सरकारने पहिल्या वर्षात फक्त निर्णयांना स्थगिती देण्याचा काम केल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावेळी देवेंद्र फडवणीस यांच्यासह विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर आणि इतर भाजपा नेते उपस्थित होते.

अर्णब, कंगना प्रकरणात सरकार तोंडावर आपटला
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयातून सरकारच्या कामगिरीची माहिती कळते. मुंबई हायकोर्टानेही कंगना विरोधातील कार्यवाही अप्रामाणिक आणि शुद्ध हेतूने केलेली नाही असं मत नोंदवत महापालिकेची कारवाई रद्द ठरवली. यासोबत संजय राऊत यांची वागणूक संसदीय सदस्याला शोभणा नाही असं कोर्टाने म्हणलं. कायदा हा कुठल्याही व्यक्तीला लक्ष्य करण्यासाठी नसतो. सुप्रीम कोर्टाने सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं. .

शेतकऱ्यांना दिलेले वाचन मुख्यमंत्री विसरले
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना न दिलेले वचन मुख्यमंत्र्यांना लक्षात राहिलं पण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिलेलं वचन ते विसरेल, अशी टीका फडवणीस यांनी केली आहे. धान उत्पादकांना बोनस दिला याबाबत सरकारचं स्वागतच आहे. पण, सोयाबीन आणि कापूस उत्पादकांचा काय त्यांना मदत देण्याची मागणी यावेळी देवेंद्र फडणीस यांनी केली.