मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपा-शिवसेना युतीचा फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीतच ठरला असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. यावर बोलताना गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना, अद्याप युतीचा फॉर्म्युला ठरलाच नसल्याचे सांगत, समान जागावाटपचा विषयच येत नसल्याचे सांगितले. दोन्ही पक्ष श्रेष्ठी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवतील, त्यामुळे उगाच कुणी त्यात मत मांडू नये असा टोला त्यांनी राऊत यांना लगावला.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये महाजनादेश यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमाची जागा निश्चित करण्यासाठी आले होते त्यावेळी ते बोलत होते. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सत्ता व जागावाटपात समान वाटप असा युतीचा फॉर्म्युला ठरला असल्याचा दावा केला होता. मात्र, युतीत असा कोणताही फॉर्म्युला ठरला नसल्याचा खुलासा गिरीश महाजन यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीचा फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीतच ठरला असल्याचा दावा राऊत यांनी केला होता. सत्तेत आणि जागावाटपात समान वाटप असा फॉर्म्युला भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच व्यासपीठावर असताना ठरला असल्याचे राऊत म्हणाले होते. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीबाबत युतीचा कोणताही फॉर्म्युला अजून ठरला नाही. पण दोन्ही पक्ष युतीसाठी सकारात्मक असल्याचे महाजन यांनी सांगितले.
- सर्वात चांगला व्यायाम प्रकार आहे पोहणे, दूर होतात हे ७ आजार
- सकाळी गरम पाणी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच प्या, अन्यथा होतील हे ५ ‘साईड इफेक्ट’
- हा ‘डाएट प्लॅन’ बाहेर काढेल शरीरातील सर्व घाण, वजन होईल कमी
- फ्रेश आणि सुंदर दिसण्यासाठी खा ‘हे’ ४ ‘ब्युटी फूड्स’, वाढतो चेहऱ्याचा ‘ग्लो’
- हार्ट अटॅक’पासून वाचवू शकतात ‘हे’ ७ मसाले! कोलेस्टेरॉल राहते नियंत्रणात
- अचानक सोडू नका ‘जिम’, आहे धोकादायक, होऊ शकतात ‘हे’ ५ दुष्परिणाम