काय सांगता ! होय, चक्क 2 अल्पवयीन मुलींनी केलं एकमेकींसोबत लग्न

पोलीसनामा ऑनलाइन – झारखंडमधील धनबाद येथील एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. येथील चक्क दोन अल्पवयीन मुलींनी एकमेकींसोबत मंदिरात लग्न करून घेतलं आहे. ह्या समलिंगी लग्नाने तेथील परिसरात खळबळ उडाली आहे. त्या दोघीही आपल्या परिवारापासून वेगळ्या राहतात. या दोघेही जवळपास १३ ते १४ वर्षाची आहेत. तर पोलिसांनी या दोघींनाही त्यांच्या कुटुंबांकडॆ त्यांचं वय पूर्ण होईपर्यंत राहण्यासाठी पाठवलं आहे.

अधिक माहिती म्हणजे, दोन्ही मुली धनबादच्या सरायढेला क्षेत्रात राहणाऱ्या आहेत. यातील जी मुलगी १४ वर्षांची आहे. ती मुलांसारखी हेअरस्टाईल करते आणि तसेच कपडे घालते. ती कशाचीही भीती न बाळगता बिनधास्त उत्तरे देते. तर १३ वर्षांची मुलगी साधी, कमी बोलणारी आहे. या दोघींपैकी पती झालेल्या मुलीने सांगितले की, दोघी एकमेकींवर बालपणापासून प्रेम करतात. दोघीही एकमेकींशिवाय जिवंत राहू शकत नाहीत. एकीने सांगितले की, काही दिवसांपूर्वीच त्यांनी पळून जाऊन मंदिरात लग्न केलं होतं. आणि जवळच एका झोपडीत राहत होत्या. अशात त्यांनी त्यांच्या एका मैत्रीणी मदत घेण्याचा विचार केला. मात्र तिने काही मदत केली नाही. त्यानंतर दोघीही घरी परत आल्या आहेत.

दरम्यान, १३ वर्षीय मुलीच्या आईने तिच्या कपाळावर कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र पाहिलं. तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. तसेच दोन्ही परिवारातील लोक पोलीस ठाण्यात गेले. मात्र हे प्रकरण धनबाद महिला पोलीस ठाण्यात नोंद झालं आहे. तसेच, त्या मुली पत्रकारांसोबत बोलताना म्हणाल्या, स्वत:ला पती सांगणारी मुलीने म्हंटले, आता आम्ही अल्पवयीन आहोत. जेव्हा आम्ही वयस्क होऊ तेव्हा मी माझ्या पत्नीला घरी परत आणेन आणि सोबत ठेवेन. मी तिच्यावर इतकं प्रेम करेन की, पुन्हा कधी पोलीस स्टेशनचं तोंड बघावं लागणार नाही. या दरम्यान तिच्या घरच्यांनी तिच्यासोबत जबरदस्ती केली तर मी तिला घेऊन येईन. याच अटीवर आम्ही दोघीही वयस्क होईपर्यंत आपापल्या घरी परतत आहोत असे तिने सांगितले.

तसेच पत्नी बनलेल्या मुलीने म्हटले, ‘माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. तो माझा पती आणि मी त्याची पत्नी. पण आम्ही सध्या अल्पवयीन आहोत. त्यामुळे सध्या आपापल्या परिवाराकडे परतत आहोत. आम्ही वयस्क झाल्यावर सोबत राहू’. असे तिने सांगतले. तर या दोन्ही मुलीच्या घरचे लोक घाबरले आहेत. आणि ते रागात आहेत. त्यांना त्यांच्या मुली आपल्या घरी परत हव्या आहेत. ते म्हणत आहेत की, मुलगी कधी दुसऱ्या मुलीसोबत लग्न करू शकते का? त्या दोघींचं हे नातं कोणत्या स्थितीत स्वीकारणार नाहीत, असे त्यांच्या घरचे म्हणत आहेत.