मिथुनच्या मुलाला जामीन मंजूर ,पण लग्न रद्द

मुंबई :पोलीसनामा ऑनलाईन

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाअक्षय याला न्यायालयाकडून सशर्त अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्याच्यावर बलात्कार,फसवणूक,गर्भपाताची सक्ती केल्याचा आरोप आहे. तसेच त्याची आई योगिता बाली यांच्यावर देखील धमकावल्याचा आरोप केला आहे.एका भोजपुरी अभिनेत्रीने हे आरोप केले आहेत. दरम्यान पाच जुलै रोजी मुंबई उच्च न्ययालयाकडून महाअक्षय आणि त्याची आई योगिता बाली यांना अटकपूर्व जमीन देण्यास नकार दिला होता. त्यानंतर ७ जुलै रोजी महाअक्षय चे लग्न होते. मात्र लग्नाच्या दोन दिवस आधीच जामीन न मिळाल्यामुळे हे लग्न रद्द करण्यात आले आहे. त्यानंतर महाअक्षयने दिल्लीच्या रोहिणी कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला. त्यानुसार, काल रोहिणी कोर्टाने महाअक्षयला अंतरिम जामीन मंजूर केला.

[amazon_link asins=’B073T3DG4Y’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’85d87609-828f-11e8-941b-d98bc558e07f’]

ऐन लग्नाच्या काळात महाअक्षय वर बलात्कारासारखे आरोप झाले, त्यामुळे हे लग्न होणार की नाही अशी शंका सर्वांच्या मनात होती मात्र हे लग्न होणारच असे महाक्षयची होणारी सासू शीला शर्मा यांनी स्पष्ट केले. त्यांनी ‘यस बॉस’, ‘नदिया के पार’ यामध्ये अभिनय केला आहे. त्यांच्या मुलीशी महाक्षयचा विवाह ठरला आहे.

या प्रकरणात संबंधित भोजपुरी अभिनेत्रीने महाअक्षयवर बलात्काराचा आरोप केला आहे. तिने दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की, “मी एप्रिल २०१५मध्ये महाअक्षयला भेटले. मे २०१५ मध्ये त्याने मला नशा देऊन माझ्यावर बलात्कार केला. पुढेही मी त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहिले. कारण त्याने मला लग्नाचे वचन दिले होते. पण मी प्रेग्नंट राहिल्यावर त्याने माझ्यावर गर्भपात करण्यासाठी दबाव आणला. मिथुनची पत्नी व महाअक्षयची आई योगिता बाली हिनेही आपल्याला धमकावले. यापश्चातही महाअक्षय लग्नाचे वचन देत राहिला. मी आईबाबांना समजावेल, असे तो मला म्हणाला. पण वेळ आल्यावर कुंडली जमत नसल्याचे सांगून त्याने लग्नास नकार दिला”.