कडू म्हणाले, अवनी वाघिणीने १४ जणांचे बळी घेतले. कदाचित ती दिल्ली, मुंबईच्या एखाद्या परिसरात फिरली असती तर काय केले असते. १५ बळी जाईपर्यंत सरकारने वाट का पाहिली? बोकडे, कोंबड्या मेल्या तर चर्चा होत नाही. एक वाघीण मेली तर देशभर चर्चा होते. पण साडेतीन लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यानंतर याची चर्चा होत नाही.
शेतकरी कोंबड्या, बकऱ्यांच्या रांगेत आहे. आमदार, खासदार, एखादा अधिकारी मेला तर तो वाघाच्या रांगेत जाऊन बसतो, ही विषमता आहे. किमान मरणाला समान न्याय दिला पाहिजे, अशा व्यवस्थेची त्यांनी मागणी केली. सरकारने जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाईची मर्दानगी दाखवावी. पीक विमा योजना चांगली आहे. मात्र, जाणीवपूर्वक मंत्र्यांच्या मर्जीतील कंपनीला कंत्राट देण्यात आले. विम्याची रक्कम जर शेतकऱ्यांना मिळत नसेल तर जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करत सरकारने मर्दानगी दाखवून द्यावी, असे बच्चू कडू म्हणाले.