अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – तिहेरी हत्याकांडांमुळे तणावाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुक न काढता रक्तदान शिबीराचे आयोजन करुन शेकडो कार्यकर्त्यांसह रक्तदान करीत आमदार बच्चू कडू यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
आपल्या आगळ्या वेगळ्या स्टाईलने आणि थेट जनतेला भिडून काम करणारा आमदार म्हणून बच्चु कडु लोकप्रिय आहेत. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे चार दिवसांपूर्वी दोन गटात हाणामारी होऊन त्यात तीन जणांच्या हत्या झाल्या. यामुळे शहरात तणाव असून पोलीसांनी जमाव बंदी लागू केली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत मिरवणुक न काढण्याचा निर्णय प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडु यांनी घेतला. त्यानंतर त्यांनी शक्ती प्रदर्शन न करता रक्तदान शिबीर आयोजित केले. त्यात शेकडो कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. बच्चु कडु यांनीही रक्तदान करुन मग उमेदवारी अर्ज दाखल केला.
visit : Policenama.com
- तारुण्य टिकविण्यासाठी तरूणांनी ‘हे’ खावे, व्यक्तीमहत्व खुलण्यासाठी आवश्य
- दम्याचा त्रास असेल तर घरातील ‘हा’ पदार्थ आहे रामबाण उपाय, जाणून घ्या
- मुलींमध्ये अठराव्या वर्षानंतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या, करा ‘हे’ उपाय
- पुरूषांनो, डोक्याला टक्कल पडली असेल तर करा ‘हे’ खास घरगुती उपाय
- महिलांनी ‘हे’ फळ खाल्ले तर येणार नाही ‘हार्टअटॅक’, हे आहेत आरोग्यदायी फायदे
- तुम्हाला ‘ही’ सवय असेल तर वेळीच व्हा सावध, हाडे होऊ शकतात ठिसूळ
- परीक्षेचे टेन्शन घेऊ नका, तणावमुक्त राहण्यासाठी अशी करा तयारी
- आरोग्यासह सौंदर्य प्रदान करणारे आहे ‘हे’ पारंपारिक पेय, नियमित प्या