सोलापूर विद्यापीठात नापास विद्यार्थ्यांचे गुण वाढविले, रोहित पवार म्हणाले – ‘हा तर हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय’

पोलिसनामा ऑनलाईन – रोहित पवार हे कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी गुरुवारी (ता. २१) सोलापुरात आले होते. तेव्हा “सोलापूर विद्यापीठामध्ये नेमकं काय घडलं हे बघावं लागेल. जेव्हा एखादी प्रश्‍नपत्रिका आउट होते, तेव्हा ही प्रश्‍नपत्रिका विकत घेणारे विद्यार्थी असतात श्रीमंत वर्गाचे. मात्र सर्वसामान्य व कष्ट करण्याची ताकद आहे, असे गरीब विद्यार्थी मागे पडतात. विद्यापीठ हे ज्ञानपीठ असते, अन्‌ अशा ज्ञानपीठात असे गैरप्रकार घडत असेल तर त्याच्या खोलात जायची गरज आहे. असे गैरकृत्य युवकांना पटणारे नाही. संबंधित दोषींवर कडक कारवाई व्हावी,” असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार म्हणाले.

दरम्यान, सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील गैरप्रकार अनेकदा समोर आले आहेत. नापास विद्यार्थ्यांना चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करणे, कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना गुण वाढवून देणे, परीक्षेला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्याला गैरहजर दाखविणे असे प्रकार यापूर्वी समोर आले आहेत. मात्र, २५ डिसेंबर २०१९ रोजी विद्यापीठाने अनेक विद्यार्थ्यांचे गैरप्रकार करून गुण वाढविल्याची तक्रार पोलिसांत केली. धक्‍कादायक बाब म्हणजे, कुलगुरू परदेशी गेल्यानंतर त्यांचा लॉगइन आयडी व पासर्वड वापरून नापास विद्यार्थ्यांचे गुण वाढविल्याचे समोर आले होते. त्या वेळी विद्यापीठाने एक समिती स्थापन करून प्राथमिक तपास केला होता. त्यानंतर गैरप्रकार झाल्याचे सिद्ध झाल्यानंतर विद्यापीठाने पोलिसांत धाव घेतली.

सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील गैरप्रकार अनेकदा समोर आले आहेत. नापास विद्यार्थ्यांना चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करणे, कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना गुण वाढवून देणे, परीक्षेला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्याला गैरहजर दाखविणे असे प्रकार यापूर्वी समोर आले आहेत. डॉ. कोकरे यांनी त्यांच्या पात्रतेची कागदपत्रे अपूर्ण दिल्याने त्यांना पदावरून काढण्यात आले होते. सायबर पोलिसांनी त्यानंतर कसून तपास केला आणि हा गैरप्रकार समोर आला. मात्र, २५ डिसेंबर २०१९ रोजी विद्यापीठाने अनेक विद्यार्थ्यांचे गैरप्रकार करून गुण वाढविल्याची तक्रार पोलिसांत केली. धक्‍कादायक बाब म्हणजे, कुलगुरू परदेशी गेल्यानंतर त्यांचा लॉगइन आयडी व पासर्वड वापरून नापास विद्यार्थ्यांचे गुण वाढविल्याचे समोर आले होते. त्या वेळी विद्यापीठाने एक समिती स्थापन करून प्राथमिक तपास केला होता. त्यानंतर गैरप्रकार झाल्याचे सिद्ध झाल्यानंतर विद्यापीठाने पोलिसांत धाव घेतली.