MNS Chief Raj Thackeray | मराठवाडा मुक्ती संग्रामाचा विस्तृत इतिहास पाठ्यपुस्तकांमध्ये शिकवला गेला पाहिजे – राज ठाकरे
मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे. यानिमित्त मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी एक पत्र लिहित हा दिवस सणासारखा साजरा झाला पाहिजे, असे आवाहन केले आहे. राज ठाकरेंनी म्हटले की, आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. मराठवाडा मुक्ती संग्राम (Marathwada Mukti Sangram Din) हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता. हैद्राबादच्या निजामाचा हेतू साध्य झाला असता, तर भारताचे अखंडत्व धोक्यात आलं असतं. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेने जो लढा दिला तो देशाच्या अखंडत्वासाठी दिलेला लढा आहे, आणि म्हणून हा खरं तर आजचा दिवस, एखाद्या सणासारखाच साजरा व्हायला पाहिजे, असं राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी म्हटलं आहे.
मला असं एक नेहमी वाटतं, ह्या इतक्या मोठ्या लढ्याबद्दल आपल्याकडे बऱ्यापैकी अनभिज्ञता आहे. मला अनंत भालेरावांचा (Anant Bhalerao) ह्या विषयावरचं पुस्तक वाचून लढ्याबद्दल काही गोष्टी कळल्या. मग पुढे नरहर कुरुंदकरांची (Narhar Kurundkar) ह्या विषयावरची व्याख्यानं युट्युबवर ऐकताना नवी माहिती मिळत राहिली. पण एकूणच असं वाटतं की ह्या इतक्या गौरवशाली लढ्याबद्दल फारसं कोणाला माहित नाही.
माझं तर म्हणणं आहे की आता हे नवं शिक्षण धोरण येतंय, त्यानुसार त्या त्या राज्यातील पुसून टाकला गेलेला इतिहास शिकवला जाणार आहे. त्यामुळे आता मराठवाडा मुक्ती संग्रामाचा विस्तृत इतिहास पाठ्यपुस्ताकांमध्ये शिकवला गेला पाहिजे. संयुक्त महाराष्ट्रासाठीचा (Maharashtra) लढा आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा, हे महाराष्ट्राने आणि मराठी माणसाने कदापि विसरता कामा नये.
पण मराठवाडा मुक्तिसंग्रामाविषयी फारसं बोललं का जात नसेल? अर्थात ‘रझाकारांचं’ लांगुलचालन करण्यात धन्यता मानणाऱ्यांचं सरकार कित्येक वर्ष राज्यात होतं, त्यामुळे हे होणं स्वाभाविक होतं.
पण सध्या ह्याच रझाकारांची पुढची औलाद, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या सोहळ्यात सामील व्हायला नकार देते,
आणि दुर्दैव असं की माझ्या संभाजीनगरकरांच्या उरावर ही असली घाण येऊन बसली आहे.
संभाजीनगरकरांच्या उरावर फक्त रझाकारच नाहीयेत तर आधुनिक ‘सजा’कार पण येऊन बसलेत.
गेली कित्येक वर्ष संभाजीनगर महापालिकेच्या (Sambhajinagar Municipal Corporation) खुर्चीत बसून,
लूट करणारे आणि रोज संभाजीनगरकरांना शिक्षा भोगायला लावणारे ‘सजा’कार, अर्थात लवकरच महाराष्ट्र
नवनिर्माण सेना रझाकार आणि ‘सजा’कार यां दोघांचा बंदोबस्त करेलच, असा इशारा राज ठाकरे
(MNS Chief Raj Thackeray) यांनी दिला आहे.
हैद्राबादच्या निजामाचा हेतू साध्य झाला असता, तर भारताचं अखंडत्वच धोक्यात आलं असतं. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेने जो लढा दिला तो देशाच्या अखंडत्वासाठी दिलेला लढा आहे, आणि म्हणून खरं तर #मराठवाडा_मुक्तीसंग्राम_दिन, हा एखाद्या सणासारखाच साजरा व्हायला पाहिजे!#MarathwadaMuktiSangram pic.twitter.com/T7qnjdH3FS
— Raj Thackeray (@RajThackeray) September 17, 2022
Web Title :- MNS Chief Raj Thackeray | raj thackeray on hyderabad liberation day marathwada mukti sangram din mns
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update