‘बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, मनसेचा झेंडा हाती घ्यायची हीच ती वेळ’
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात महाविकास आघाडीच्या स्वरूपात तीन पक्ष एकत्र आले आणि राज्यातील सत्ता काबीज केली. महाराष्ट्रातील याच बदलत्या परिस्थितीचा लाभ घेण्यासाठी आता राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढे सरसावली आहे. शिवसेनेने आपल्या हिंदुत्ववादी तत्वांचा विचार न करता कायम विरोधात असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर मैत्री केली आणि यामुळे काही प्रमाणात का होईना मराठी माणूस नाराज झाला आहे असे बोलले जाते. याच पार्श्वभूमीवर आता मनसेनं शिवसैनिकांना साद घातली आहे. बाळासाहेबांच्या कडव्या शिवसैनिकांनो निराश होऊ नका, मनसेचा झेंडा हाती घ्या, असं आवाहन मनसेकडून करण्यात येत आहे.
पोषक आहारासाठी राब राब राबलेल्या कार्यकर्त्यांच्या वाट्याला आली सपक महाखिचडी..
पण सच्च्या कार्यकर्त्यांनो,बाळासाहेबांच्या कडव्या शिवसैनिकांनो निराश होऊ नका…
निर्लज्जपणे असाच सुरु राहील सत्तेचा खेळ
मनसेचा झेंडा हाती घ्यायची हीच ती वेळ
बाळासाहेबांच्या जयंतीला ‘मन से’ सामील व्हा— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) January 22, 2020
मनसे चित्रपट शाखेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी या बाबतीत एक ट्विट केलं आहे. ट्विटच्या माध्यमातून खोपकर यांनी महाविकास आघाडीवर हल्ला केला आहे. खोपकर यांनी या आघाडीला ‘सपक महाखिचडी’ची उपमा दिली आहे. ते म्हणाले की, जे शिवसैनिकांनी पोषक आहारासाठी कष्ट केलेत त्यांच्या वाट्याला सपक महाखिचडी आली आहे. पण सच्च्या कार्यकर्त्यांनो, बाळासाहेबांच्या कडव्या शिवसैनिकांनो निराश होऊ नका… असे त्यांनी ट्विट करून कार्यकर्त्यांना आधार दिला आणि म्हणाले की, ‘निर्लज्जपणे असाच सुरू राहील सत्तेचा खेळ… मनसेचा झेंडा हाती घ्यायची हीच ती वेळ…’ बाळासाहेबांच्या जयंतीला ‘मन’से सामील व्हा, असं आवाहन देखील त्यांनी ट्विटमधून शिवसैनिकांना केलं.
शिवसेनेनं भाजपाबरोबरची जुनी मैत्री तोडत काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात धरला आणि राज्यातील सत्तेची समीकरणं बदलली. त्यामुळे शिवसेना आता आपली हिंदुत्वाची आणि मराठीची भूमिका फार जोरकसपणे मांडू शकत नाही. याचाच फायदा मनसे उचलून पक्षाला उभारी देण्यास सज्ज झाला आहे. गोरेगाव येथे मनसेचा मेळावा पार पडणार असून या मेळाव्यात पक्षाची नवीन भूमिका राज ठाकरे मांडणार असल्याचे समजत आहे. विशेष म्हणजे मनसेचा नवा ध्वजही या मेळाव्यातून पुढं आणला जाणार आहे. आता या मेळाव्यात राज ठाकरे हे मराठीचा मुद्दाच पुन्हा लावून धरतात की मग भाजपला सोयीस्कर अशी हिंदुत्वाची भूमिका घेतात याबाबत सगळीकडून तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यामुळे खोपकर यांचे ट्विट महत्वाचे मानले जात आहे.
- थंडीच्या दिवसात प्या ‘आल्याचे पाणी’, होतील ‘हे’ 4 फायदे !
- ‘कापूर’ वाढवेल तुमचे आरोग्य आणि सौंदर्य ! जाणून घ्या 5 फायदे
- बटाट्याची साठवण करताना ‘या’ 4 गोष्टी लक्षात ठेवा
- सावधान ! ‘च्युइंगम’ चुकून गिळल्यास होऊ शकतात ‘या’ 4 गंभीर समस्या
- ‘या’ 3 पद्धतीने हात धुवा स्वच्छ, अनेक गंभीर आजारांपासून होईल बचाव
- प्रमाणापेक्षा जास्त घाम का येतो ? जाणून घ्या 3 कारणे आणि 3 उपाय !