आधी BJP ची आणि आता काँग्रेसची ‘लाचारी’ करतेय शिवसेना, मनसेची टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे देशात राजकारण चांगलेच तापले आहे. यातच आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. शिवसेनेने आधी भाजपची लाचारी केली आता काँग्रेसची लाचारी करत असल्याची जहरी टीका मनसेचे संदीप देशपांडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

शिवसेनेच्या नेतृत्वाने गेली पाच वर्षे भाजपची लाचारी केली आता काँग्रेसची करत आहे. जे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत ज्यांच्या पोटात आग आहे. त्यांनी निर्णय घ्यायचा आहे की लाचारीची श्रीखंड पुरी खायची की राजसाहेबांना साथ देऊन कष्टाची मीठ भाकरी खायची, असे ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे.

दरम्यान, गेल्या चार दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना भारतात मेक इन इंडिया नसून रेप इन इंडिया सुरु असल्याचे म्हटले होते. यानंतर भाजपच्या खासदारांनी राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली. मात्र, राहुल गांधी यांनी मी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. माफी मागणार नाही, असे वक्तव्य केले होते. यांनंतर अनेकांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/