MNS On Bhagat Singh Koshyari | ‘नावात भगतसिंग इतकंच यांचं कर्तृत्व, बाकी वरचा कोश रिकामाच दिसतोय‘ – मनसे
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MNS On Bhagat Singh Koshyari | महाराष्ट्रीयन माणसांच्या अस्मितेला गालबोट लावणारे वक्तव्य राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari) यांनी केल्याने सध्या सर्वत्र संतप्त पडसाद उमटत आहेत. हा वाद वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. कोश्यारी यांच्या वादग्रस्त व्यक्तव्यानंतर भाजपाशी जवळीक केलेल्या मनसेने देखील कोश्यारी यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. राज्यपालांच्या विधानावरून भगतसिंग कोश्यारी यांच्यावर टीका करताना मनसेने म्हटले आहे की, नावात भगतसिंग इतकंच यांचं कर्तृत्व, बाकी वरचा कोश रिकामाच दिसतोय. (MNS On Bhagat Singh Koshyari)
मुंबईतील एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटले की, ठाणे, मुंबई (Thane, Mumbai) या शहरातून गुजराती (Gujrati), राजस्थानींना (Rajasthani) काढून टाकले तर तुमच्याकडे पैसेच उरणार नाहीत. मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हटले जाते तेदेखील म्हणता येणार नाही. यावरून मनसेचे प्रवक्ते गजानन काळे ट्विट केले असून यात म्हटले आहे की, पुरे आता… यांनी आता घरी बसावे… मराठी माणसाला ज्ञान पाजळण्याच्या भानगडीत पडू नये… नावात भगतसिंग इतकेच यांचे कर्तृत्व बाकी वरचा कोश रिकामाच दिसतोय यांचा. काळे यांनी संतापजनक आणि निषेध हे दोन हॅशटॅग वापरले आहेत. (MNS On Bhagat Singh Koshyari)
पुरे आता …
यांनी आता घरी बसावं …
मराठी माणसाला ज्ञान पाजळण्याच्या भानगडीत पडू नये …
नावात भगतसिंग इतकेच यांच कर्तृत्व बाकी वरचा कोश रिकामाच दिसतोय यांचा …#संतापजनक #निषेध pic.twitter.com/wGredZLmVJ— Gajanan Kale (@MeGajananKale) July 30, 2022
गजानन काळे (gajanan Kale) यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मागे सावित्रीमाई बद्दल आता मराठी, महाराष्ट्राबद्दल बेताल वक्तव्य. हे पार्सल उत्तराखंडला परत पाठवण्याची वेळ आली आहे. हे खपवून घेतले जाणार नाही. मराठी, महाराष्ट्राची सभ्यता, संस्कृतीचा अवमान होत असेल तर राज्यपाल या पदाचा मान, मरातब गेला चुलीत. ज्या विषयात कळत नाही तिथे चोमडेपणा करू नका.
दरम्यान, राष्ट्रवादीने देखील राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांनी म्हटले आहे
की, महाराष्ट्र आणि मुंबईतील माणूस कर्तबगार आणि सक्षम आहे. मराठी माणसाच्या जीवावर अनेक राज्य पोसली जातात.
आम्ही चटणी भाकर खाऊन पोट भरून इतरांना पोसणारी इमानदार माणसे आहोत.
आपण मराठी माणसाचा अपमान केलाय महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा.
Web Title :- MNS On Bhagat Singh Koshyari | mns gajanan kale slams bhagat singh koshyari over his mumbai statement
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune News | रायरेश्वर किल्ल्यावर तरुणाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यु