2000-2000 रुपये ट्रान्सफर केल्यानंतर 8.55 कोटी शेतकऱ्यांना मोदी सरकारनं पाठवला ‘हा’ संदेश
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने अंतर्गत खात्यात २-२ हजार रूपये हस्तांतरित केल्यानंतर सरकारने ८ कोटी ५५ लाख शेतकर्यांना एक संदेश पाठवला आहे. त्यात असे लिहिले आहे की, ‘ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत २००० रुपयांची सन्मान रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात पाठवली गेली आहे. आशा आहे की, दर चार महिन्यांनी मिळणारी ही रक्कम तुम्हाला शेतीच्या गरजेसाठी मदत करेल. बलराम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.’
शेतकर्यांना पैसे पाठवून शेतीत त्याचा वापर करावा, याची जाणीव करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. देशात सुमारे ८६ टक्के लघु व सीमांत शेतकरी आहेत, ज्यांच्या शेतीसाठी वार्षिक ६००० रुपयांची मदत ही आशेच्या किरणांसारखी आहे. त्यामुळे कृषी तज्ञ व शेतकरी संघटना ते २४ लाखांपर्यंत वाढवण्याची मागणी करत आहेत.
पैसे आले कि नाही, ते असे तपासा
सर्वप्रथम प्रधानमंत्री किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करा.
आता उजवीकडे असलेल्या ‘Farmers Corner’ वर जा.
येथे तुम्हाला ‘Beneficiary Status’ हा पर्याय मिळेल.
‘Beneficiary Status’ पर्यायावर क्लिक करा.
आता तुमच्यासमोर एक नवीन पृष्ठ उघडेल.
नवीन पृष्ठावर, तुम्हाला आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यातील एक पर्याय निवडावा लागेल.
दिलेल्या ठिकाणी तुम्ही निवडलेला क्रमांक टाका.
आता तुम्हाला ‘Get Data’ या लिंकवर क्लिक करावे लागेल. सर्व डेटा तुमच्या समोर येईल.
FTO दिसले तर समजून जा कि पैसे येणार आहेत
जर योजनेंतर्गत तुमच्या खात्यात २ हजार रुपये आले नाहीत आणि स्टेटसमध्ये एफटीओ (फंड ट्रान्सफर ऑर्डर) लिहिलेले येत असेल, तर समजून जा की पैसे येणार आहेत. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. अद्यापही बर्याच लोकांच्या खात्यात FTO is Generated and Payment confirmation is pending चा मेसेज दिसत आहे. जर आधार व्हेरिफिकेशन पेंडिंग असेल, तर तुमच्या खात्यात पैसे येण्यास वेळ लागेल.