शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या असलेल्या पंतप्रधान पीक विमा योजनात सरकारकडून बदल ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारने शेतकऱ्यांना खूश करण्याच्या विचारात आहे. केंद्र सरकार पंतप्रधान पीक विमा योजनेत काही महत्वपूर्ण बदल करण्याची तयारी केली आहे. यामागे हेतू आहे की, शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना ऐच्छिक बनवणे आणि जास्त प्रिमियम असलेल्या पीकांना हटवणे. सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार लोकांच्या मनात शंका आहे की, वीमा कंपन्या या योजनेतून लाभ कमवत आहेत. कृषि मंत्रालयांकडून राज्यांच्या स्तरावर गुंतवणूक कोष बनवणे आणि बचत करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर वीमा जोखीम ट्रांसफर करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

एवढा असेल प्रिमियम –

अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले की, याशिवाय ही सूचना देखील देण्यात आला आहे की, सिंचन क्षेत्रात ५० टक्कांपेक्षा आधिकच्या विमा सुरक्षेसाठी प्रिमियमची मर्यांदा २५ टक्के आणि पीकात सिंचन क्षेत्रात ५० टक्क्यांहून कमी असेल. तर प्रिमियमची मर्यादा ३० टक्के ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या दर वर्षी संशोधन करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

२०१६ मध्ये सुरु झाली होती योजना –

पंतप्रधान पीक विमा योजना २०१६ साली सुरु करण्यात आली आहे. यात नैसर्गिक अपत्ती ज्यांना रोखता येणार नाही, पेरणी पासून ते कापणी पर्यंतच्या कालावधीत सुरक्षेसाठी पीक विमा योजना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यात खरीप पीकांना २ टक्के प्रिमियम दर लावण्यात येतो. तर रबी पीकांसाठी दर १.५ टक्के तर कमर्शियल पीकांसाठी हा दर ५ टक्के आहे.

अधिकाऱ्याने सांगितले की, या योजनेला लागू करताना अनेक समस्या आल्या. मंत्र्यांनी या कमतरता ओळखून त्या काही बदलाव करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यासाठी राज्य सरकारांकडून मते मागवण्यात आली आहेत. अधिकाऱ्यांने असे ही सांगितले की, कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये अनिवार्य नामांकनाने असंतोष निर्माण होत आहे.

उलट्यांचा त्रासाने प्रवास टाळत असाल तर करा ‘हे’ ४ उपाय

लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ ७ फायदे

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या