पायपीट करत जाणाऱ्या मजुरांकडे पाहून मोदी सरकारनं उचललं पाऊल, राज्यांना केल्या ‘या’ सूचना

पोलिसनामा ऑनलाईन – देशभरात लॉकडाउनमुळे अडकलेले मजूर राष्ट्रीय महामार्गावरून मूळ गावी चालत जात असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. अत्यंत विदारक हाल-अपेष्टा सहन करत कामगार स्वतःचा मुळगाव गाठत आहेत.त्यामुळे केंद्र सरकारने याची दखल घेत देशातील सर्व राज्य सरकारांना ’कुठल्याही परप्रांतीय मजुराला चालत घरी जाऊ देऊ नका’ अशा सूचना केली आहे.

देशातील वेगवेगळ्या राज्यात कामाच्या शोधात आलेले मजूर लॉकडाउनमुळे अडकले गेले. हाती रोजगार नसल्यामुळे या मजुरांवर उपासमारीची वेळी आली. त्यामुळे मजुरांनी स्थलंतराचा मार्ग निवडला. काही कामगार सायकल वर जात आहेत तर काही कामगार जाण्यासाठी काहीच साधन उपलब्ध होत नाही खिशात पैसे नाही म्हणून थेट चालतच जात आहेत. त्यामुळे रेल्वेमार्फत सर्व परप्रांतीयांना त्यांच्या घरी पाठवले जाईल, तोपर्यंत तात्पुरत्या निवार्‍यात सोय करण्याचे निर्देश केंद्र सरकारने राज्य सरकारांना दिले आहेत.

दिवसाला सध्या 100 श्रमिक एक्स्प्रेस जातात त्या वाढवण्याची केंद्राची तयारी तयारी असून कामगारांना त्यांच्या मुळगावी जाण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. मजुरांनी कोणत्याही परिस्थितीत चालत जाऊ नये. तोपर्यंत त्यांना सर्व सुविधा राज्य सरकारने उपलब्ध कराव्यात. खाणे, राहणे इतर सोयी सुविधा देण्याकडे राज्य सरकारने लक्ष द्यावे, अशी सूचना देण्यात आली आहे. एकूणच राज्य सरकार वेगवेगळ्या माध्यमातून मजुरांना सोयीसुविधा उपलब्ध करून देणे हे त्यांचे काम आहे, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.