नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘मोदी आमचे वडील आहेत , फक्त आमचेच नाही तर ते राष्ट्रपिता आहेत ‘ असे विधान अण्णाद्रमुकचे मंत्री के टी. आर. बालाजी यांनी केले आहे. अम्मा (जयललिता ) यांच्या मृत्यूनंतर मोदींनीच अण्णाद्रमुक पक्षाला आपल्या पुत्राप्रमाणे जपले आहे . असेही बालाजी यांनी बैठकीदरम्यान म्हंटले आहे. विरुथुनगर मधील पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते . याबाबतची माहिती ट्विट करून एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
Tamil Nadu Minister K T Rajendra Balaji: When Amma(Jayalalithaa) was alive she was in full control, her decisions were her own. So,it was different but in today's context due to absence of Amma, Modi is our daddy. He is India's daddy. So we have accepted his leadership. (8.3.19) pic.twitter.com/ex9c1MT96W
— ANI (@ANI) March 9, 2019
या बैठकीदरम्यान बालाजी म्हणाले की, “मोदी आमचे वडिल आहेत. जेव्हा आम्ही आमच्या अम्माला गमावले , तेव्हा मोदींनी आम्हाला मार्गदर्शन केले . आणि आश्रय दिला.” मोदी फक्त अण्णाद्रमुकचे वडिल नाहीत, ते राष्ट्रपिता अहेत. म्हणून अण्णाद्रमुकने भाजपशी युती केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
https://twitter.com/ANI/status/1104309284953825280
नुकतंच पियुष गोयल यांनी चेन्नईमध्ये अण्णाद्रमुकच्या नेत्यांची भेट घेतली होती. भेटीनंतर गोयल यांनी भाजप आणि अण्णा द्रमुकच्या निवडणूकपूर्व युतीची घोषणा केली होती. तसेच लोकसभेचे जागावाटपही त्यांनी जाहीर केले होते.