संतापजनक ! वडिलांचे ‘हात-पाय’ बांधून नराधमांकडून 17 वर्षीय मुलीवर अडीच तास सामुहिक बलात्कार
रामपूर/ उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – वडिलांचे हात-पाय बांधून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. नराधम तरुणांनी मुलीच्या वडिलांचे हात-पाय बांधून तिच्यावर अडीच तास अत्याचार करत होते. या प्रकरणात पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला मात्र शहजाद नगर पोलिसांनी त्यांची दिशाभूल केली.
उलट पोलिसांनीच पीडितेच्या कुटुंबीयांवर जबाब बदलणं आणि तक्रार न देण्याचा आरोप केला आहे.
उत्तर प्रदेशातील शहजादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावामध्ये विट भट्टीवर हे कुटुंब भट्टी लावण्याचे काम करते. याच ठिकाणी त्यांची छोटी झोपडी आहे. सोमवारी रात्री तीन तरूण झोपडीत घुसले आणि त्यांनी वडिलांना चाकूचा धाक दाखवून बांधून ठेवले. त्यानंतर त्यांनी अल्पवयीन मुलीच्या तोंडाला रुमाल बांधून रात्री 9 ते 11.30 पर्य़ंत सामूहिक बलात्कार करत राहिले. अल्पवयीन मुलीने आरडाओरडा केल्यानंतर आरोपी फरार झाले.
मुलीचा आरडा ओरडा ऐकून त्या ठिकाणी जमलेल्यांनी वडिलांचे हात पाय मोकळे केले. पीडित मुलीच्या कुटुंबाने पोलीस ठाण्यात जाऊन याप्रकरणाची माहिती दिली. मात्र पोलिसांनी गुन्हाच नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली. शहजाद नगर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याने कार्यवाही आणि मेडिकलसाठी मुलीला 8 ते 10 दिवस पोलीस ठाण्यात ठेवावे लागेल असे सांगितल्याचे मुलीच्या काकांनी सांगितले.
दुसरीकडे शहजाद नगर पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. महिला बलात्कार प्रकरणात तात्काळ गुन्हा नोंदवण्याचे आदेश आहे. या प्रकारानंतर वडील आणि मुलगी वारंवार जबाब बदलत आहेत. तसेच मुलगी मेडिकल करून घेण्यास नकार देत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी पीडित मुलीच्या कुटुंबासोबत कोणतेही अशा प्रकारचे वर्तन केले नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- कोणतेही काम करत असताना मुखाने ‘रामराम’ म्हणा, होईल ‘हा’ फायदा, जाणून घ्या –
- मनुष्य जन्माचा उपयोग कसा करावा हे संत ज्ञानोबाराय सांगतात... –
- वारकरी गळ्यात ‘तुळशी’चीच माळ का घालतात ? जाणून घ्या कारण –
- देवासाठी भरपूर पैसा खर्च केला म्हणजे देव भेटतो हा माणसाचा ‘भ्रम’ आहे : संत तुकोबाराय –
- माणूस चांगला आहे की वाईट हे त्याच्या ‘जाती’वरून नाही तर ‘गुणा’वरून ठरवावे : संत तुकोबाराय –
- ‘हसता-खेळता’, ‘चालता-बोलता’ही ‘भक्ती’ करता येते, जाणून घ्या –
- मरतेवेळी भगवंताचे नाम’स्मरण’ केल्याने ‘हे’ फायदे होतात ?, जाणून घ्या –
- ‘परमार्थ’ केंव्हा करावा ? बालवयात, तारुण्यात की म्हातारपणी ?, जाणून घ्या –
- श्री संत भगवानबाबांची 55 वी पुण्यतिथी शिरूर मध्ये उत्साहात साजरी –