‘या’ कारणामुळे पुण्यात वाढला ‘कोरोना’चा प्रादुर्भाव, टाटा इन्स्टिट्यूटच्या सर्वेक्षणातून माहिती समोर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच शाळा, महाविद्यालये सुरू झाल्यानंतर कोरोनाचा प्रसार अधिक प्रमाणात झाला. तरुणांमध्ये कोरोनाची लक्षणे नसले तरी ते कोरोनाचे प्रसारक ठरत असल्याचे निष्कर्ष टाटा इन्स्टिट्यूटच्या वतीने काढण्यात आला आहे. तसेच माॅल, रेस्टॉरंट आणि लग्न समारंभ यामुळे सुद्धा कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज घेण्यात आलेल्या कोरोना आढावा बैठकीत अधिकचे निर्बंध लागू करण्याचा सध्या तरी विचार नसल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले आहे. टाटा इन्स्टिट्यूटला पुन्हा एकदा सध्या सुरू असलेले लसीकरण व कोरोना स्थितीचा अभ्यास करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. यानंतर १२ मार्च रोजी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत पुढील निर्बंधाबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सौरभ राव यांनी स्पष्ट केले आहे.

शहर आणि जिल्ह्यात खूप झपाट्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या सुकाणू समिती बैठकीत शहर आणि जिल्ह्यात अधिक कडक निर्बंध लागू करण्याची वेळ आल्यास काय परिणाम होतील याचा अभ्यास करून अहवाल सादर करण्यास टाटा इन्स्टिट्यूटला सांगण्यात आले आहे. हा अहवाल आज सादर करण्यात आला. दर शुक्रवारी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली हि बैठक घेतली जाते, पण अधिवेशन सुरू असल्याने अजित पवार या बैठकीला उपस्थित नव्हते.

यामुळेच टाटा इन्स्टिट्यूटला सध्या सुरू असलेले लसीकरण व कोरोनाची वाढती संख्या याचा विचार करून पुन्हा एकदा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. त्यामळे १० मार्च रोजी पुन्हा एकदा सुकाणू समितीची बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीमध्ये टाटा इन्स्टिट्यूटकडून देण्यात आलेल्या अहवालावर चर्चा करण्यात येणार आहे. यानंतर १२ मार्च रोजी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढाव बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत वस्तुस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्बंधाबाबत निर्णय घेण्यात येईल असे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले आहे.