स्वाईन फ्लूचे पुन्हा थैमान सुरु ; पुण्यात सर्वाधिक रुग्ण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात पुन्हा एकदा स्वाईन फ्ल्यूने डोके वर काढल्याचे चित्र आहे. राज्यावर स्वाईन फ्लूचे पुन्हा एकदा संकट आले आहे. गेल्या २२ दिवसांत २६२ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात ८ जणांचा मृत्यू झाला असून सर्वाधिक रुग्ण पुण्यात असल्याचे उघड झाले आहे.
वातावरणातील सातत्याने होणारे चढउतार होत आहे. वातावरणातील अनपेक्षित बदलामुळे स्वाईन फ्लूच्या विषाणुंसाठी हे पोषक ठरत आहे. अचानक थंडी वाढत असल्याने सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
देशभरात स्वाईन फ्लूचा फैलाव वाढला आहे. स्वाईन फ्लूने देशात आतापर्यंत ७७ बळी घेतले आहेत. राज्यातल्या पुणे आणि नागपूर शहरांमध्येही स्वाईन फ्लूच्या रूग्णांची संख्या वाढली आहे. स्वाईन फ्लूच्या रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य विभागाचीही चिंता वाढली आहे.
राज्यातल्या पुणे आणि नागपूर शहरात स्वाईन फ्लूचे रूग्ण झपाट्याने वाढू लागलेत. बदलत्या हवामानामुळे स्वाईन फ्लूच्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. पुणे, नागपूरमध्ये स्वाईन फ्लूचे २६२ रूग्ण आढळले तर आतापर्यंत ८ जणांचा स्वाईन फ्लूने बळी घेतलाय. देशभरात स्वाईनचे अडीच हजार रूग्ण आढळले असून ७७ जणांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झालाय. राजस्थानात स्वाईन फ्लूचे जवळपास दीड हजार रुग्ण आढळलेत.
सर्दी , खोकला, ताप ही स्वाईन फ्लूची प्राथमिक लक्षणे आहेत. ती दिसू लागताच योग्य उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. गर्भवती महिला, दमा, मधुमेह, कर्करोग तसेच एचआयव्ही ग्रस्त रुग्णांना स्वाईन फ्लूचा धोका अधिक संभवतो. अशा रुग्णांनी वर्षातून एकदा स्वाईन फ्लूची लस घेणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. तापमानातील अनपेक्षित बदल हे स्वाईन फ्लूच्या विषाणूंसाठी पोषक वातावरण आहे. अशा वेळी या विषाणूंची लागण होऊ नये, याची काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

स्वाईन फ्लूची कधी होते बाधा ?

– अति ऊन आणि अति थंडी अशा मिश्र वातावरणात स्वाईन फ्लू वेगानं पसरतो
– सर्दी, खोकला, ताप ही प्राथमिक लक्षणं
– स्वाईन फ्लू वर उपयुक्त टेमी फ्लू हे औषध सर्वत्र उपलब्ध
– गंभीर आजार असणाऱ्यांनी स्वाईन फ्लूची लस घ्यावी
– स्वाईन फ्लू हा संसर्गजन्य आजार
– स्वाईन फ्लूची लागण होऊ नये म्हणून विशेष काळजी घेणे आवश्यक