‘या’ मागण्यांसाठी ब्राह्मण समाजाचे आझाद मैदानावर धरणे आंदोलन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – स्वतंत्र आरक्षण आणि इतर विविध मागण्यांसाठी समस्त ब्राह्मण समाजातर्फे 22 जानेवारी रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले जाणार आहे.

समस्त ब्राह्मण समाजाचे समन्वयक विश्वजीत देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, महापुरुषांच्या बदनामी विरोधी कायदा, पुरोहितांना मानधन आदि पंधरा मागण्या समाजाने केल्या आहेत. या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे.

त्यामुळे समाजात नाराजी असल्याचा दावा देशपांडे यांनी केला. केंद्र सरकारने खुल्या प्रवर्गातील आरक्षण नुकतेच जाहीर केले असले तरी ते न्यायालयात किती टिकेल याविषयी त्यांनी साशंकता व्यक्त केली. स्वतंत्र आरक्षणाबरोबर इतर मागण्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मान्य झाल्या पाहिजेत यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.