आज घोषणा केलेल्या सरकारी खैरातीत समाजातील विविध घटकांना खुश ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मराठा समाजाला या आधीच आरक्षण दिले आहे. त्यानंतर केंद्राने खुल्या प्रवर्गासाठी १० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. या दोन निर्णयात ओबीसी प्रवर्ग नाराज झाला होता त्यांना खुश करण्यासाठी आता सरकारने ७०० कोटी रुपयांच्या योजनांना मंजुरी दिली आहे.
मंत्री मंडळाच्या बैठकीत आणखी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजना आणि केंद्राची पंतप्रधान आरोग्य विमा योजना इथून पुढे एकत्रित राबवण्यात येणार आहे. गरीब रुग्णांना ५ लाख रुपयापर्यंतचे उपचार मोफत मिळावे या साठी हि योजना सुरु करण्यात आली आहे.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झालेले निणर्य
– ओबीसी आणि भटक्या जातींसाठी ७०० कोटींच्या योजनांचा प्रस्ताव मंजूर
– ओबीसी महामंडळाला २५० कोटी रुपयांचा निधी प्रधान करणे
– भटक्या विमुक्त महामंडळाला ३०० कोटी निधी मंजूर
– इतिहासात पहिल्यांदाच वडार आणि रामोशी समाजाला विशेष पॅकेज