पंतप्रधान महोदय, आम्हाला तुर्तास बंदच राहायचेय, नको ‘रेल्वे – विमान’ सेवा, ‘या’ मुख्यमंत्र्यांची PM मोदींना विनंती
नवी दिल्ली : वृत्तसंस्था : देशात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. असे असूनही, केंद्र सरकार सतत लॉकडाऊनमध्ये शिथिलता देत आहे. सध्या कोरोना साथीच्या आजारामुळे काही राज्यात परिस्थिती अधिक गंभीर बनत चालली आहे. आता राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना लॉकडाऊनमध्ये शिथिलता न देण्याचे आवाहन केले आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती केली कि, कोरोना संसर्गाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत, अशा परिस्थितीत 31 मेपर्यंत रेल्वे सेवा पूर्ववत केली जाऊ नये. दरम्यान, तामिळनाडूमध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गाची एकूण 8000 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर 53 लोकांचा मृत्यू झाला आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी चेन्नईमधील कोविड -19 रूग्णांची संख्या वाढत असल्याचे नमूद केले आणि सांगितले की, 31 मे पर्यंत नियमितपणे हवाई सेवा देखील बंदी घातली गेली पाहिजे . जर तसे झाले नाही तर कोरोना विषाणूचा संसर्ग लवकर पसरेल. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत तामिळनाडूच्या सीएम पलानीस्वामी यांनी केंद्र सरकारकडे दोन हजार कोटींची मदत मागितली आहे. तसेच राज्यातील थकबाकी जीएसटी लवकरात लवकर रद्द करण्याची विनंती त्यांनी केंद्र सरकारला केली आहे.
As positive cases in Chennai are showing an increasing trend, don't permit train service up to May 31 in Tamil Nadu. I request you not to begin regular Air services till May 31: Tamil Nadu CM Edappadi K Palaniswami at PM Narendra Modi's video conference meeting with CMs. #COVID19 pic.twitter.com/hlAuMXadbT
— ANI (@ANI) May 11, 2020
तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनीही रेल्वे सेवा सुरू न करण्याची केली मागणी
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना रेल्वे सेवा पुन्हा सुरू न करण्याची विनंती केली आहे. ते म्हणाले की, देशात कोरोनो विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी हे पाऊल आवश्यक आहे. दरम्यान, तेलंगणामध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची एकूण 1,196 प्रकरणे नोंदली गेली. माहितीनुसार, आजपर्यंत 751 रूग्णांना उपचारानंतर निरोगी झाल्याने रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. या आजारामुळे आतापर्यंत 30 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 415 लोक अद्याप संक्रमित आहेत.
Chief Minister K Chandrashekar Rao has urged Prime Minister Narendra Modi not to resume the passenger train services, which were stopped as part of preventive measures to contain the spread of #coronavirus in the country: Telangana CM's Office (CMO) pic.twitter.com/YkaOlx5wMn
— ANI (@ANI) May 11, 2020
तामिळनाडूमधील कोविड -19 ची प्रकरणे , 8,000च्या पार
सोमवारी तामिळनाडूमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सहा जणांचा मृत्यू झाला आणि कोविड -19 च्या 798 नवीन घटना नोंदल्या गेल्या. राज्यात दररोज मोठ्या प्रमाणात लोकांना या विषाणूची लागण होत असून आतापर्यंत एकूण 8000 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार राज्यातील विविध रुग्णालयात उपचारानंतर संसर्गमुक्त झालेल्या 135 जणांना आज सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत एकूण 1,959 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.