धक्कादायक ! Covid-19 संसर्गाच्या तुलनेत बुरशीजन्य आजारांनी अधिक मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नुकतीच इंडियन क्लिनिकल मेडिकल रिसर्च संस्थेने (आयसीएमआर) केलेल्या संशोधन अहवालातून कोरोनाच्या उपचारात अँटिबायोटिक्सचा अतिवापर आणि बुरशीजन्य आजार रुग्णांसाठी घातक ठरत असल्याची बाब समोर आली आहे. मुंबईतील सायन आणि हिंदुजा रुग्णालयांचा या संशोधन अहवालात समावेश होता. अहवालानुसार, कोरोना Covid-19  संसर्गाच्या तुलनेत बुरशीजन्य आजारांमुळे अधिक मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

देशभरातील १७,५३४ रुग्णांचा अभ्यास इंडियन क्लिनिकल मेडिकल रिसर्च संस्थेने केला. त्यातील चार टक्के रुग्णांचा मृत्यू बुरशीजन्य आजारांनी झाल्याचे दिसून आले. कोरोनामुळे Covid-19 मृत्यू झालेल्यांचे प्रमाण १०.६ टक्के आहे. बुरशीजन्य आजाराचे ६३१ रुग्ण आढळले, त्याचे प्रमाण ३.६ टक्के हाेते. याआजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण ५६.७ टक्के आहे.

“अँटिबायोटिक्सचा वापर विनाकारण केल्यास शरीरावर विपरीत परिणाम होतो. परिणामी, गुंतागुंत निर्माण झाल्याने मृत्यू ओढावतो. यात १७ टक्के रुग्णांना बुरशीजन्य आजार असल्याचे दिसून आले, तर ७३ टक्के अँटिबायोटिक्सचा वापर करण्यात आला. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरुण कोरोना रुग्णांनी घरी असतानाच अँटिबायोटिक्स घेण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले, त्यामुळे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांना अधिक क्षमतेच्या अँटिबायोटिक्सची गरज लागल्याचेही निदर्शनास आले,” असे या संशोधन अहवालाविषयी आयसीएमआरच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे.

संशोधन अहवालात १० टक्के रुग्णांनी गरज नसताना अँटिफंगल औषधांचा वापर केल्याचे दिसून आले. सध्या म्युकरमायकोसिसच्या धोक्यामुळेही अँटिफंगल औषधांचा गैरवापर होताना दिसत आहे. हे धाेकादायक आहे. त्यामुळे रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा किंवा बदल झाल्यानंतर त्वरित उपचारांची दिशा बदलून औषधांविषयी योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे आहे.

Pune : पुण्याच्या कोव्हिड रूग्णालयात धक्कादायक घटना ! कोरोनाबाधितांचे दागिने लंपास, महिलेसह दोघांना अटक

Death in Custody : पोलिस निरीक्षकासह तिघांना अटक तर PSI फरार

Video : ‘क्या हुआ तेरा वादा… जयवंतरावजी’; ‘तो’ व्हिडीओ शेअर करत चित्रा वाघ म्हणाल्या…

RBI आणतेय 100 रूपयांची ‘लयभारी’ नवी नोट, जाणून घ्या वैशिष्ट्ये