Mukesh Ambani | मुकेश अंबानी आणि नीता अंबांनी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी, अँटिलिया निवासस्थानाची सुरक्षा वाढवली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – रिलायन्स उद्योग समुहाचे (Reliance Group of Industries) प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी (Nita Ambani) यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने रिलायन्स फाऊंडेशनच्या कार्यालयात फोन करुन अंबानी परिवाराला जीवे मारण्याची धमकी दिली. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) या प्रकरणाची तातडीने दखल घेत तपास सुरु केला आहे. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या अँटिलिया (Antilia) निवासस्थानाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

आज (बुधवार) दुपारी एकच्या सुमारास रिलायन्सच्या सर एचएन हॉस्पिटलच्या (Sir HN Hospital) लँडलाईनवर एक अज्ञात नंबरवरुन कॉल आला होता. रिलायन्स हॉस्पिटल मध्ये बॉम्बस्फोट (Bomb Blast) करण्याची धमकी या कॉलच्या माध्यमातून देण्यात आली. तसेच मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनाही जीवे मारण्याची धमकी यावेळी देण्यात आली. याप्रकरणाची दखल डीबी मार्ग पोलिसांनी (DB Marg Police) घेतली असून पोलीस फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर रिलायन्स हॉस्पिटल आणि त्यांचे निवासस्थान असलेल्या अँटिलिया या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी सर्व बाजूंनी तपास सुरु केला आहे.

दरम्यान, यापूर्वी बिष्णू विदू भौमिक Bishnu Vidhu Bhowmik (वय-56) या व्यक्तीने मुकेश अंबानी
आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.
आरोपी हा दक्षिण मुंबईतील असून त्याचे ज्वेलरीचे दुकान आहे.
आरोपीने ऑगस्ट महिन्यात रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या सार्वजनिक दूरध्वनी क्रमांकावर फोन करुन धमकी दिली होती.

Web Title :- Mukesh Ambani | reliance death threat to mukesh ambani and nita ambani mumbai police investigation underway

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Aurangabad Crime | औरंगाबाद पोलिसांचा फार्म हाऊसवर सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा, पावणे दोन कोटींचा मुद्देमाल जप्त

Shivsena Chief Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे हरणारी लढाई लढताहेत का?