राहुल गांधी पप्पू  नाही तर गप्पू झाले आहेत : मुख्तार अब्बास

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आता पप्पू राहिले नाहीत तर ते आता गप्पू झाले आहेत. इतकेच नव्हे तर राहुल गांधी यांचा पप्पू पासून तर गप्पूपर्यंतचा त्यांचा प्रवास खोटे बोलण्याच्या आधारे सुरु झाला आहे. असे वक्तव्य केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास यांनी केले आहे.

काही दिवसांपूर्वी झालेल्या ५ राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये पाचपैकी तीन राज्यात सत्ता काबीज केली आहे. दरम्यान राहुल गांधी आता पप्पू राहिले नाहीत अशी चर्चा सर्वत्र होत आहे. याच चर्चेला प्रति उत्तर देत’ राहुल गांधी आता पप्पू राहिले नाहीत. ते आता गप्पू झाले आहेत. त्यांनी बरोबर म्हटले होते की आता ते पप्पू राहिले नाहीत. आता ते पप्पूहून गप्पू झाले आहेत आणि पप्पूपासून ते गप्पूपर्यंतचा त्यांचा प्रवास खोटे बोलण्याच्या आधारे सुरू झाला आहे, तर ते बरोबर बोलत आहेत’असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास यांनी केले आहे.

इतकेच नव्हे तर मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेसने सत्ता काबीज केल्या नंतर  या तीन राज्यांत काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर राहुल गांधींच्या नेतृत्व कौशल्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन बराच बदलला आहे. तीन राज्यांमध्ये भाजपाला पराभवाचा धक्का बसल्यानंतर, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं बाजी मारल्यानंतर, पप्पू आता परमपूज्य झालेत, अशी मार्मिक टीकाही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती.