या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झालं होते त्यानंतरही घटना घडली. याचा अर्थ स्ट्रक्चरल ऑडिटमध्येही भ्रष्टाचार होऊ शकतो हे पहिल्यांदा कळलं आहे. ऑडिट करताना वरवर काम केलं गेलं त्यामुळे ही घटना घडली आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.
लोकांचे प्रश्न सोडवा टोलवाटोलवी करू नका –
ज्यावेळी ही दुर्घटना झाली त्यावेळी महापालिका आणि रेल्वे विभागाने टोलवाटोलवी केली. लोकांचे प्रश्न सोडवा टोलवाटोलवी करू नका, भुयारी मार्ग निर्माण करा ज्यामुळे पुन्हा अशा घटना घडणार नाही असेही जयंत पाटील म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे झाली पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असून यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांना मुख्यमंत्र्यांनी काही लाखांची मदत जाहीर केली आहे. परंतु या रकमेने काही होत नाही. ज्यांचा मृत्यु झाला त्यांची लहान मुलं आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील जबाबदार व्यक्तीला सरकारी नोकरीत तातडीने रुजू करा अशी मागणीही त्यांनी केली आहे.
मुंबई महापालिकेच्या मुख्यालयापासून जवळच असलेला ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानका’ जवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जण मृत्युमुखी पडले, तर ३१ जण जखमी झाले.
- किमान शरद पवारांना तरी भाजपमध्ये घेऊ नका : उद्धव ठाकरे
- ‘बीजेपी , आरएसएस आणि सीपीएम हे सर्वच कमकुवत असल्याने हिंसेचा वापर करतात’
- वंचित बहुजन आघाडीकडून एकाचवेळी ३७ उमेदवारांची घोषणा
- नरेंद्र मोदींनी केला आचारसंहितेचा भंग ? निवडणूक आयोगाने मागवला अहवाल
- २५ हजार रुपयांची लाच घेताना पोलीस कॉन्सटेबल अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात