Mumbai High Court | कोविडचा ‘सामना’ करण्याबाबत हायकोर्टाने केले ‘ठाकरे सरकार’चे कौतूक
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) म्हटले की, कोरोना व्हायरस महामारी (corona virus epidemic) मुळे विकसित झालेल्या समस्यांचा सामना करण्यात महाराष्ट्र (Maharashtra) आघाडीवर होता. हायकोर्टाने कोविड-19 च्या दुसर्या लाटे (second wave of Covid-19) चा उल्लेख करत टिप्पणी केली की, अपेक्षा आहे की, पुढील वर्षी एक नवीन सुरूवात होईल, तसेच नागरिक एप्रिल 2021 ची पुनरावृत्ती होऊ देणार नाहीत. (Mumbai High Court)
ही टिप्पणी मुख्य न्यायमूर्ती दत्ता दीपांकर (Chief Justice Datta Dipankar) यांच्या पीठाने केली. न्या. दीपांकर आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक (Justice M. S. Karnik) यांनी मागील वर्षी दाखल जनहित याचिका निकाली काढताना ही टिप्पणी केली.
या जनहित याचिकांमध्ये ‘ठाकरे सरकार’ (Thackeray government) ने उचललेली पावले, महामारीसंबंधी संसाधनांच्या वितरणाच्या मुद्द्यांवर न्यायलयाकडे मदत देण्यासाठी मागणी करण्यात केली होती. याचिकाकर्त्यांनी याचिका मागे घेण्याची परवानगी मागितल्यानंतर, हायकोर्टाने जनहित याचिका निकाली काढल्या. (Mumbai High Court)
याचिकाकर्त्यांना असे यासाठी करायचे होते, कारण त्यांना जी मदत पाहिजे होती त्यापैकी बहुतांश पुरवण्यात आली होती किंवा सरकारने न्यायालयाच्या आदेशांवर कारवाई केली होती.
हायकोर्टाने म्हटले की, आम्हाला हे म्हणण्यास संकोच वाटत नाही की, महाराष्ट्र कोविड-19 चा सामना करण्यात आघाडीवर होता. याशिवाय, न्यायालयाने उल्लेख केला की, राज्य आणि केंद्राने लस, आवश्यक वैद्यकीय मदतीला प्राथमिकता देणे सुरूच ठेवले पाहिजे. हे ज्येष्ठ नागरिक, अपंग, रूग्णांसाठी केले पाहिजे, ज्यामुळे हे निश्चित होईल की नागरिक सुरक्षित आहेत.
Web Title :- Mumbai High Court | maharashtra pioneer in tackling covid19 says bombay high court mumbai HC
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime | दुर्दैवी ! पत्नीला कार शिकवताना सुटला ताबा, कारसह पती-पत्नी थेट विहिरीत, पत्नीचा मृत्यू
Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 71 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी