25000 कोटींचा घोटाळा : अजित पवारांसह ‘या’ ५० जणांवर FIR दाखल करण्याचा कोर्टाचा आदेश
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित हजारो कोटी रुपयांच्या कर्ज वितरण घोटाळ्याप्रकरणी पाच दिवसांत एफआयआर नोंदवण्याचे आदेश आज (गुरुवार) मुंबई हायकोर्टाने पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे बँकेच्या संचालक मंडळावर असलेल्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडळसूळ, शिवाजीराव नलावडे यांच्यासह ५० नेते अडचणीत सापडले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आदी पक्षांच्या नेत्यांवर या घोटाळ्याचा आरोप करणारी याचिका सुरिंदर अरोरा यांनी दाखल केली होती.
याचिकेतील आरोपांची कसून चौकशी होणं गरजेचे आहे असे स्पष्ट करत न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या खंडपीठाने राखून ठेवलेला आपला अंतिम निकाल आज जाहीर केला. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या पुढाऱ्यांवर आणि सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल का होत नाहीत ? गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांना कोण रोखतंय ? असा सवाल करत मागील सुनावणीला हायकोर्टाने मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस उपायुक्तांना जाब विचारला होता.
काय आहे प्रकरण ?
राज्याची शिखर बँक म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची स्थापना १९६१ मध्ये झाली. बँकेच्या संचालक मंडळ आणि अध्यक्षांनी काही सूत गिरणी आणि साखर कारखान्यांना कोट्यावधी रुपयांची कर्जे वाटली. या कर्जाची वेळेवर परतफेड न झाल्याने बँकेचे प्रचंड आर्थिक नुकसान होऊन बँक डबघाईला गेली. या संचालक मंडळामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आदी पक्षांच्या नेत्यांचा समावेश आहे. याप्रकरणी सुरींदर अरोरा यांनी २०१५ मध्ये तक्रार दाखल करत हायकोर्टात अॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे.
संचालक मंडळातील सर्वपक्षीय नेते
अजित पवार, विजयसिंह मोहिते-पाटील, दिलीप सोपल, माणिकराव पाटील, निलेश बाळासाहेब नाईक, दिलीपराव देशमुख, राजेंद्र शिंगणे, मदन पाटील, हसन मुश्रीफ, मधुकरराव चव्हाण, अमरसिंह पंडीत, सदाशिव मंडलीक, यशवंतराव मंडलीक, यशवंतराव गडाख, प्रसाद तनपुरे, तानाजी चोरगे, मिनाक्षी पाटील, पृथ्वीराज देशमुख, आनंदराव अडसूळ, संतोषकुमार कोरपे, जयंत पाटील, देवीदास पिंगळे, जयवंतराव आवळे, कै. पांडुरंग फुंडकर, ईश्वरलाल जैन, राजन तेली, अमरसिंह पंडीत, शेखर निकम, गंगाधर कुंटुरकर
- फक्त २ अक्रोडने मोकळ्या होतील शरीरातील सर्व नसा, अशाप्रकारे करा वापर
- वजन वाढण्याची चिंता आहे का ? ‘हे’ ५ पदार्थ बिनधास्त खा, वाढणार नाही वजन
- स्मोकिंग सोडल्याच्या २० मिनिटापासून ‘ते’ १० वर्षानंतर शरीरावर असा होतो परिणाम
- आपल्या बेबीसाठी सर्वात चांगले तेल कसे निवडावे ? जाणून घ्या माहिती
- हरड, बहेला, आँवला, घी सक्कर में खाए ! हाथी दाबे काँख मे, साठ कोस ले जाए !!
- तांदळाच्या पाण्याने चेहरा धुतल्याने होतात मोठे फायदे, तुम्हीही करून पहा
- पार्टीनंतर होणारा हँगओव्हर दूर करण्यासाठी मदत करतील ‘हे’ 9 उपाय
- दही-भात खाण्याचे ५ मोठे फायदे, तुम्हीसुध्दा अवश्य ट्राय करून पहा