Maratha Reservation : ‘माझा जीव धोक्यात घालून सर्व ठिकाणी फिरतोय, मी आता पूर्णपणे थकलोय’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मराठा आरक्षण (Maratha Reservation) हा विषय गांभीर्यानं घ्या. त्यातील बारकावे समजून घ्या हे मी सरकारला नेहमी संगितलं आहे. जे कोणी समान्य प्रशासन वभिगाचे जे कोणी सचिव असतील त्यांनी याचा फॉलोअप घेणं गरजेचं आहे. त्यामुळं सरकारला माझी विनंतीपूर्वक सूचना आहे की, ताबडतोब जी चूक झाली ती दुरुस्त करा अशी विनंती खासदार छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी केली आहे. एका वृत्तावाहिनीसोबत ते बोलत होते.

यावेळी बोलताना संभाजीराजे म्हणाले, “मी किती वेळा बोलायचं. माझा जीव धोक्यात घालून मी सर्व ठिकाणी फिरत असतो. जालना, कोल्हापूर, नवी मुंबई या ठिकाणी होतो. मी गर्दीत सोशल डिस्टेंसिंग (Social distancing) न पाळता फिरत आहे. मी माझा जीव धोक्यात घालून सर्व समाजासाठी काम करत आहे. मी आता बोलून बोलून थकलो आहे. पूर्णपणे थकून गेलो आहे. सरकारनं ताबडतोब पावलं उचलावीत.” एवढीच विनंती असल्याचं संभाजीराजे यांनी सांगितलं.

पुढे बोलताना ते म्हणाले, सरकारी वकिल कुठे आहेत असा सवाल सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) केला जातो आणि तिथं वकिल उपस्थित नसतात हे दुर्दैव आहे. गंभीर आहे. त्यामुळं मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan) जिथं कुठं असतील त्यांनी कृपया कोऑर्डिनेट करण्याची गरज आहे असंही त्यांनी सांगितलं.

संभाजीराजे यांच्या या विनंतीनंतर अशोच चव्हाण यांनी मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकारनं आणखी जोर लावायला पाहिजे म्हणजे काय करायचं ? असा सवाल केला आहे. मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठासमोर व्हायला पाहिजे ही फक्त सरकारची नाही तर सर्व याचिकाकर्त्यांची भूमिका आहे. मराठा आरक्षणावरून आम्हाला कोणतंही राजकारण करायचं नाही. मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात मंजुरी मिळावी ही आमची ठाम भूमिका आहे असंही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं.

आज सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणी होती. मात्र मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणी पुढं ढकलण्यात आली आहे. मराठा आरक्षण स्थगितीवर आता 4 आठवड्यांनी पुढील सुनावणी होणार असल्याचं न्यायालयानं सांगितलं आहे. मराठा आरक्षणाच्या माध्यमातून नोकरी आणि शिक्षणामध्ये मिळालेल्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली होती. ही स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारनं कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती नागेश्वर राव (Nageswara Rao) यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे.