२ वर्षांपासून रखडलेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सुमारे २ वर्षांपासून रखडलेल्या ८३२ सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या निवड प्रक्रियेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. निर्णयामुळे या ८३२ सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे या ८३२ निरीक्षकांनी आज मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची भेट घेतली.

भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आणि दिवाकर रावते यांनी या निरीक्षकांचे अभिनंदन केले आहे. तसंच तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी राज्य शासनाने नेहमीच भरतीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच सहायक मोटार वाहन निरीक्षक भरतीतील किचकट नियम रद्द करुन ही प्रकिया सुटसुटीत करण्यात आली होती. याला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. पण सर्वोच्च न्यायालयाने नुकताच यासंदर्भात निकाल देताना राज्य शासनाच्या परिवहन विभागाने सेवा प्रवेश नियमात केलेले बदल तसेच त्यानुसार करण्यात आलेली भरती योग्य असल्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो. आता नियुक्त झालेल्या उमेदवारांना लवकरच नियुक्ती पत्रे देण्यात येतील. परिवहन विभागाला त्याबाबत आदेश दिले आहेत, असं दिवाकर रावते यांनी सांगितले.

दरम्यान, परिवहन विभागाने सहायक मोटार वाहन निरीक्षक या पदाच्या भरतीसाठी सेवा प्रवेश नियमात काही बदल केले होते. त्यात पदाची जाहीरात काढून भरती प्रक्रिया करण्यात आली होती. परंतु या बदलावर आणि नियुक्त्यांवर आक्षेप घेत या निवड प्रक्रियेवर न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने परिवहन मंडळाने भरती प्रक्रियेत केलेले बदल योग्य असल्याचे सांगितले आहेत. तसंच ही भरती योग्य असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता या ८३२ जणांच्या सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या नियुक्त्या सुरळीत पार पडतील.

आरोग्यविषयक वृत्त –