… म्हणून चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला ?, राजकीय वर्तूळात चर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या आठवडयाभरात राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आणि पदाधिकारी राष्ट्रवादीला रामराम ठोकून इतर पक्षात प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणूकीत दारूण पराभव झाल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठया प्रमाणावर आऊटगोईंग सुरू झाले आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला असून त्या लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तूळामध्ये आहे. दरम्यान, त्यांनी कोणत्या कारणामुळे राष्ट्रवादीला रामराम ठोकला याच्या कारणाबाबत सध्या राजकिय वर्तूळामध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

अलिकडील काळामध्ये चित्रा वाघ या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर नाराज होत्या असे बोलले जाते. मात्र, त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला असून त्यापाठीमागे वेगळेच कारण असल्याची सध्या चर्चा आहे. चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ हे शासकीय सेवेत आहेत. किशार वाघ हे सन 2016 मध्ये महात्मा गांधी वैद्यकीय रूग्णालयात वैद्यकीय अहवाल ग्रंथपाल म्हणून कार्यरत होते. त्यावेळी किशोर वाघ यांनी नुकसान भरपाईचा धनादेश देण्यासाठी 4 लाख रूपयाची लाच मागितली होती असा आरोप त्यांच्यावर होता. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने किशोर वाघ आणि इतर दोघांना अटक केली होती. त्या प्रकरणातून किशोर वाघ हे सहिसलामत सुटावेत म्हणूनच चित्रा वाघ या भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत अशी चर्चा सध्या राजकीय वर्तूळामध्ये आहे.

आरोग्यविषयक वृत्त