RSS कार्यकर्त्याच्या हत्येनंतर भडकले भाजप आमदार राजा सिंह, म्हणाले – ‘खुनाचा बदला खुनानेच’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात एका आरएसएस कार्यकर्त्याची, त्याच्या गर्भवती पत्नीची आणि 8 वर्षाच्या मुलाची मंगळवारी काही व्यक्तींनी घरात घुसू हत्या केली होती. त्यानंतर आता या प्रकरणाला राजकीय रंग लागला असून तेलंगणामधील भाजपचे आमदार राजा सिंह यांनी खुनाचा बदला खुनाने घेणार असल्याचे म्हटले आहे.
I urge @HMOIndia Sri @AmitShah Ji to order high level investigation in #Murshidabad #WestBengal murder case where #RSS worker, his wife & 8 year old son has been brutally killed
National media is silent as the attack is on Hindus
where are the secular & Liberal leaders hiding https://t.co/p2yTh2nEPg
— Raja Singh (@TigerRajaSingh) October 9, 2019
राजा सिंह यांनी ट्विट करत म्हटले आहे कि, मी गृहमंत्री अमित शहा यांना विनंती करतो कि, बंगालमध्ये झालेल्या या हत्येची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. त्याचबरोबर त्यांनी पुढे लिहिले कि, एका हिंदू परिवारावर हल्ला झाल्यामुळे माध्यमे शांत आहेत. धर्मनिरपेक्ष आणि उदारवादि नेते कुठे आहेत. तसेच हत्येचा बदला हत्येनेच घेण्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. तसेच हिंदू संघटनेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले. तसेच हि हत्या कारण्याऱ्यांची अशी अवस्था करणार आहे कि, संपूर्ण भारत पाहिलं, असेही त्यांनी म्हटले. तसेच या हत्येच्या कारस्थानाचा आरोप त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर केला.
दरम्यान, भाजप नेते संबित पात्रा यांनी या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. तसेच हि घटना खूप भयंकर असून हिने मला खूप अस्वस्थ केल्याचे म्हटले होते. आरएसएस कार्यकर्ता प्रकाश पाल, त्याची गर्भवती पत्नी आणि आठ वर्षांच्या मुलाची अतिशय निर्घृण हत्या करण्यात आल्याने मी दुखी झाल्याचे देखील त्यांनी यामध्ये म्हटले होते.
Visit : Policenama.com
- डोळ्यांचा रुक्षपणा घालवण्यासाठी करा ‘हे’ ४ घरगुती उपाय, घ्या जाणून
- अनिद्रेने त्रस्त आहात ?…तर ‘हा’ रामबाण उपाय करा, इतरही आहेत अनेक फायदे
- कानाच्या ‘या’ ५ समस्यांवर हे आहेत घरगुती उपाय ; जाणून घ्या
- ‘हे’ ६ घरगुती उपाय करा आणि तात्काळ उचकी थांबवा
- ‘वेटलॉस’ बाबतचे ‘हे’ १० गैरसमज नुकसानकारकचं !
- नियमितपणे १० दिवस ‘वेलची’ खा आणि ‘वजन’ घटवा
- सावधान ! ‘या’ आजारांकडे दुर्लक्ष केले तर ‘हार्ट अटॅक’ चा धोका वाढतो १७ पटीने
- महिलांनी गरोदरपणात मोबाईलचा वापर कमी करावा, अन्यथा ‘हे’ आहेत धोके !
- नैराश्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी खेळा ‘व्हिडिओ गेम’, ‘ही’ आहेत कारणे
- सावधान ! ‘अल्कोहोल’ मध्ये कधीही मिसळू नका ‘एनर्जी ड्रिंक्स’, हे आहेत धोके
- शांत आणि पूर्ण झोप हवी असेल तर ‘या’ ५ गोष्टी नेहमी टाळा, जाणून घ्या