मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोणत्याही जाती-धर्माच्या नागरिकांच्या हक्काला शासन धक्का लागू देणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. सुधारित नागरिकत्वाच्या मुद्यावरून मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने आज (सोमवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंत्रालयात भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले.
राज्यातील व मुंबईतील मुस्लीम समाजबांधवांच्या शिष्टमंडळांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट.गृहमंत्री एकनाथ शिंदे,उद्योगमंत्री सुभाष देसाई, आमदार अमीन पटेल,अब्दुल सत्तार,अबू आझमी,नवाब मलिक,पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल,पोलिस आयुक्त संजय बर्वे,मुस्लिम समाज धर्मगुरू उपस्थित pic.twitter.com/BfCiBAuumv
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 23, 2019
यावेळी गृहमंत्री एकनाथ शिंदे, आमदार अमीन पटेल, अब्दुल सत्तार, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्यासह मुस्लीम समजातील धर्मगुरु उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत नागरिकांनी कोणताही गैरसमज मनात बाळगू नये. राज्यातील कोणत्याही जाती-धर्माच्या नागरिकांच्या हक्काला शासन धक्का लागू देणार नाही असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले. तसेच राज्यात शांततेचे वातावरण कायम ठेवण्याचे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.
सुधारीत नागरिकत्व कायद्याच्या आधारे केंद्रातील भाजप सरकार धर्मिक फूट पाडत असल्याचा आरोप कायदाविरोधी आंदोलकांनी केला आहे. एनआरसी प्रक्रियेमुळे दशातील गरिबांना कागदपत्रांअभावी आपले नागरिकत्व सिद्ध करण्यात अडचणी निर्माण होणार असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे. सुधारित नागरिकत्व कायदा हा धर्माच्या आधारे नागरिकत्व देणार असल्यामुळे संविधानाच्या मूल्यांची पायमल्ली होत असल्याचाही आरोप करण्यात येत आहे.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- ‘जंक फूड’चे हे आहेत ८ धोके, ‘हे’ वाचले तर कधीही खाणार नाही
- जिरे नियमित सेवन करण्याचे ‘हे’ १० फायदे, जाणून घ्या औषधी गुण !
- ‘या’ 11 उपायांनी दूर होईल घोरण्याची समस्या ! जाणून घ्या
- ‘या’ ५ थेरपींच्या मदतीने ‘टेन्शन’ला करा गुडबाय ! जाणून घ्या
- जास्त ‘ग्रीन टी’ सेवन केल्यास होऊ शकते ‘या’ 6 प्रकारचे नुकसान