ईश्वरप्पा यांनी काल (सोमवार दि 2 एप्रिल) कोप्पल येथे झालेल्या प्रचाराच्या कार्यक्रमात अल्पसंख्याक सामुदायातील लोकांशी संवाद साधला यावेळी बोलताना ते म्हणाले की, “काँग्रेसने तुमचा (मुस्लीम सामुदायाचा) फक्त वोट बँक म्हणून वापर केला आहे. तसेच काँग्रेसने तुम्हाला लोकसभेचे तिकीटसुद्धा दिले नाही. आम्ही मुस्लिमांना तिकीट देत नाही. कारण तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवत नाही. आमच्यावर विश्वास ठेवा, मग आम्ही तुम्हाला तिकीट देऊ.”
https://twitter.com/ANI/
दरम्यान ईश्वरप्पा यांनी वादग्रस्त विधान करणे हे काही नवीन नाही. गेल्या वर्षीही त्यांनी मुस्लिमांविषयी असेच वादग्रस्त विधान केले होते ते म्हणाले होते की, “जे मुस्लीम काँग्रेसमध्ये आहेत, ते ‘हत्यारे’ आहेत. जे मुस्लीम भारतीय जनता पक्षासोबत आहेत, ते चांगले मुस्लीम आहेत.” 2012 ते 2013 दरम्यान ईश्वरप्पा हे कर्नाटकमधील जगदीश शेट्टर यांच्या नेतृत्त्वाखाली भाजप सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते.