सावत्र आईमुळेच माझ्या वडिलांनी आत्महत्या केली; भैय्यू महाराज यांच्या मुलीचा गंभीर आरोप

इंदूर : वृत्तसंस्था

राष्ट्रसंत भैय्यू महाराज यांनी काल (मंगळवार) रोजी स्वत: वर गोळी झाडून घेतली होती. भैय्यू महाराज यांना इंदूर येथील बाॅम्बे हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांचे उपचारादरम्यान निधन असुन त्यांच्यावर इंदुरमधल्या मुक्तीधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.भय्यू महाराज यांनी आपण तणावामुळे आत्महत्या केली असे सुसाईड नोटमध्ये लिहले आहे. मात्र त्यांच्या आत्महत्येबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान भैय्यू महाराज यांच्या मुलीने सावत्र आईवर आरोप केले आहेत. त्यामुळे पत्नी आणि मुलगी यांच्या वादामुळे भैय्यू महाराजांनी आत्महत्या केल्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भैय्यू महाराजांच्या पहिल्या पत्नीची मुलगी कुहू व त्यांची दुसरी पत्नी आयुषी यांच्यात वाद होते. कुहू ही भैय्यू महाराजांची पहिली पत्नी माधवीची मुलगी आहे. दरम्यान कुहू हिने सावत्र आईवर आरोप केले आहेत. यामध्ये सावत्र आईमुळेच माझ्या वडिलांनी आत्महत्या केली. असा आरोप भैय्यू महाराजांच्या आत्महत्येनंतर कुहूने आयुषी यांच्यावर आरोप केले आहेत. मात्र कुहूला मी आवडत नसल्याने ती असे आरोप करत आहे, असं आयुषी यांचं म्हणणं आहे.

भैय्यू महाराज यांच्या आत्महत्येनंतर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. काॅंग्रंसने याआधी आरोप करत सीबीआय चाैकशीची मागणी केली होती. त्यानंतर आता पहिल्या पत्नीच्या मुलीने सावत्र आईवर आरोप केला आहे. तेव्हा भैय्यू महाराज यांच्या आत्महत्येची कारणे वेगळी असल्याची शक्यता दर्शविली जात आहे.  भैय्यू महाराज यांच्या पश्चात पत्नी आयुषी, मुलगी कुहू आणि आई कुमुदिनी असा परिवार आहे.