राम मंदिर उभारण्यासाठी सरकारनं कायदा करावा – मोहन भागवत

नागपूर :  पोलीसनामा ऑनलाईन – राम मंदिर उभारण्यासाठी सरकारनं कायदा करावा असे आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. ते विजयादशमीच्या निमित्तानं आज नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2a63d784-d2c0-11e8-906a-1ba3b697f717′]

राम मंदिराबाबत बोलताना मोहन भागवत म्हणाले कि, ‘त्या जागेवर मंदिर होतं हे आता स्पष्ट झालं आहे. परंतु, अद्याप राम जन्मभूमिसाठी स्थाननिश्चिती करण्यात आलेली नाही. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाला नसता तर मंदिर केव्हाच उभारलं गेलं असतं. यासाठी, सरकारनं कायदे बनवून निर्माणाचा मार्ग प्रशस्त करावा. आत्मगौरवासाठी राम मंदिर उभं राहणं गरजेचं आहे’ असं मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

देशात खोटा प्रचार करून समाज खिळखिळा करण्याचा प्रयत्न शहरी माओवादच्या माध्यमातून होत आहे. शहरी माओवादा विरोधात जोरदार हल्ला चढवताना गरीब आदिवासीची माथी भडकवावून त्यांना समाजाविरोधात नेण्याची मोहीम आखली जात आहे, असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

जळगावमध्ये पाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

लढाई विचारांची आहे, ती विचारांनी लढली पाहिजे, असंही ते म्हणाले. संघाच्या स्वयंसेवकांना उद्देशून बोलताना, समस्या सोडवताना एकट्य़ा सरकारवर अवलंबून राहणं चुकीचं असल्याचं भागवतांनी म्हटलं.

शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशाबाबत मोहन भागवत म्हणाले कि, महिलांना मंदिरात प्रवेश नसल्याची देवस्थानची शेकडो वर्षांची परंपरा असून ती समाजाने स्वीकारलेली आहे. अनेक वर्षांपासून हे पाळले जाते. यासाठी कोणीच आंदोलन केले नव्हते, असे म्हणत भागवत यांनी महिलांना मंदिर प्रवेश बंदीचे समर्थन केले.

मार्क झुकरबर्गला ‘फेसबुक’ अध्यक्षपदावरुन हटवण्याची मागणी

काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने १० ते ५० वयोगटातील महिलांनाही शबरीमला मंदिरात प्रवेश देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर केरळमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शबरीमला मंदिर परिसराला पोलिसांच्या छावणीचे स्वरुप आले असून पुरुषांबरोबर अनेक महिलाही मंदिरात प्रवेश करण्यासाठी जात असलेल्या इतर महिलांना रोखत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महिलांना मंदिरात प्रवेश बंदी असावी याचा पुरस्कार केला आहे. त्याचा पुनरूच्चार मोहन भागवत यांनी आज आपल्या भाषणात केला.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B01FM7GGFI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d3e2a585-d2c0-11e8-abb0-33aa24f3b6de’]