Nana Patole | नाना पटोलेंची थेट PM मोदींवर टीका, म्हणाले – ‘कोरोनात ताट वाजवायला लावले आणि देशात अवदसा…’

नाशिक : Nana Patole | कोरोना काळात सगळ्यांना दिवे पेटवायला लावल्याने डॉक्टरही परेशान झाले होते. ताट वाजवायला लावल्याने देशात अवदसा आली, असे म्हणत आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर टीका केली. पटोले म्हणाले, कोरोना स्थितीबाबत खासदारांच्या समितीने रिपोर्ट दिला की दुसर्‍या टप्प्यात केंद्र सरकारच्या चुकीमुळे जास्त मृत्यू झाले. केंद्रातील सरकार पश्चिम बंगालच्या निवडणुकीत दंग होते. देशाच्या सीमा बंद केल्या नाहीत. गुजरातमध्ये गर्दी गोळा करण्यात आली. पटोले आज नाशिकमध्ये काँग्रेस मेळाव्यात बोलत होते. (Nana Patole)

नाना पटोले म्हणाले, काँग्रेस असा पक्ष आहे, त्या पक्षात निवडणुकीने अध्यक्ष निवडला जातो. काँग्रेसमध्ये ही निवडणुकीची प्रक्रिया होते त्यातून सगळ्यांना जावे लागते. त्यामुळे काँग्रेस स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाणार यात शंका नाही. सर्व कार्यकर्त्यांची हीच भावना असून कार्यकर्ता हाच पक्षाचा मुख्य घटक असल्याने काँग्रेसची देखील हीच भूमिका आहे. (Nana Patole)

पटोले पुढे म्हणाले, कोरोना काळात पैसा नव्हता पण भगवान श्री रामाच्या नावाने पाच दहा हजाराच्या वर्गणी गोळा केल्या गेल्या. कुठल्याही गोष्टीची वेळ काळ असते, सध्या पितृपक्ष सुरू आहे, योग्य वेळी रामजन्मभूमीवर जाऊ. मी अयोध्येला जाणार आणि तुम्हा सगळ्यांना घेऊन जाणार आहे. पण रामजन्मभूमीसाठी गोळा केलेले पैसे कुठे गेले.

पटोले म्हणाले, आमच्याकडे महिलांची मोठीच ताकद आहे. ओबीसी भटक्या विमुक्तांना त्रास देणार्‍यांचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. मिडीयाचे आमच्यावर अधिक प्रेम आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा देशातील 50 गावात लाईट होती. 60 वर्षात काँग्रेसने सगळ्या सुविधा कानाकोपर्‍यात पसरवल्या.

नाना पटोले म्हणाले, शेतीमध्ये क्रांती काँग्रेसमुळे आली. मोदी ओबीसीचे असते, बहुजनांचे असते तर शेतकर्‍यांविरोधी कायदे आणले नसते. नोटबंदी हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार, भाजप वाल्यांनी खूप जमिनी घेतल्या. भाजप म्हणजे चोळा मोळा कपडे आणि दुसरीकडे जाऊन जेवायचे पण नोटबंदीनंतर एवढा पैसा यांच्याकडे कुठून आला.

भाजप नेते आशिष शेलार यांच्यावर टीका करताना नाना पटोले म्हणाले,
आशिष शेलार मुस्लिम समाजावर टीका करतात. मात्र मुस्लीम समाजाची बिर्याणी यांना आवडते.
याकूबचा भाऊ शेलारला बिर्याणी चारतोय असा फोटोही व्हायरल होतो आहे.
एकूणच हिंदू-मुस्लिममध्ये वाद वाढवला जात आहे.
राज्यपाल तर अतिविद्वान आहेत, फडणवीसचाही गोल टोपी सोबत फोटो असल्याचे ते म्हणाले.

पटोले पुढे म्हणाले, ओबीसी हा समाज सत्ता परिवर्तन करू शकतो.
तुमचे अधिकार काढण्यात आले, बरबाद करण्यात आले.
समान नागरी कायदा म्हणजे तुलाही नाही आणि मलाही नाही.

Web Title :- Nana Patole | nashik playing thali during corona has decline of the country-says state president nana patole

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, निती आयोगाच्या धर्तीवर राज्यात स्वतंत्र संस्था उभारणार (व्हिडिओ)

Uddhav Thackeray On BJP | उद्धव ठाकरेंचा खोचक सवाल; म्हणाले – ‘भाजपा पेंग्विन सरकार म्हणायची, त्यांना ’चिता सरकार’ म्हणायचं का?‘