संस्थेची मुजोरी ; जाब विचारणाऱ्या दोघांना महाविद्यालयात डांबून मारहाण

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – स्वाती अशोक सूर्यवंशी या विद्यार्थिनीने दिनदयाल योजनेअंतर्गत स्किल डेव्हलपमेंट अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला होता. केंद्र शासनाच्या पंडित दिनदयाल योजनेअंतर्गत स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रामला प्रवेश घेतलेल्या एका विद्यार्थिनीचे संस्थेतील काही जणांनी एटीएम आणि पासबुक ठेवून घेतले होते़. त्यातून त्यांनी व्यवहार केल्यानंतर विद्यार्थिनीच्या भावाने याबाबत त्यांना जाब विचारताच दोघांना जबर मारहाण करीत जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली़.

याप्रकरणी सात जणांविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़. स्वाती सूर्यवंशी या विद्यार्थीनीने दिनदयाल योजनेअंतर्गत स्किल डेव्हलपमेंट अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला होता. त्यानंतर संस्थेचे प्रभारी संजय मस्के आणि इंगोले यांनी प्रमाणपत्र नोंदविण्याची भीती दाखवित स्वाती यांचे पासबुक आणि एटीएम कार्ड स्वत:कडे ठेवून घेतले होते. स्वातीला कुठलीही कल्पना न देता तिच्या खात्यातून व्यवहार करण्यात आले. ही बाब स्वातीचा भाऊ चंद्रकांत सूर्यवंशी यांना समजल्यानंतर आठवड्या पूर्वी संस्थेच्या कार्यालयात गेले होते. यावेळी त्यांनी मस्के आणि इंगोले यांना एटीएम कार्ड आणि पासबुक का ठेवून घेतले? याबाबत विचारणा केली़ तसेच तसा शासन आदेश आहे काय? अशी चौकशी केली.

परंतु यावेळी सूर्यवंशी यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. संस्थेच्या अध्यक्षाला भेटू देण्याची त्यांनी विनंती केली़.  परंतु त्यासाठी त्यांना प्रतीक्षा करण्यास सांगण्यात आले. थोड्याच वेळात त्या ठिकाणी आलेल्या इतर चार ते पाच जणांनी सूर्यवंशी त्यांचा मित्र संदीप गजभारे यांना जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली़.  याप्रकरणी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात संजय मस्के, इंगोले यासह इतर पाच जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मारहाणीच्या घटनेचा अधिक तपास नांदेड ग्रामीण पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

‘या’ टिप्स वापरून मधुमेहावर करा नियंत्रण

‘हा’ आहे जपानी सर्वात स्वस्त उपाय ज्याने तुम्ही ठेवू शकतात तुमचे वजन नियंत्रणात

जरा जपून, ‘या’ कारणांमुळे होऊ शकते केस गळती

धक्कादायक ! भारतीयांचं वयोमान वायू प्रदूषणामुळे तब्बल ‘एवढ्या’ वर्षांनी झाले कमी